शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

CoronaVirus: निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 11:11 IST

CoronaVirus: निवडणुकांच्या ड्युटीवर असताना कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअलाहाबाद हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरेकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना १ कोटींची भरपाई मिळावी - हायकोर्ट

लखनऊ: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यातच देशामध्ये विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी निवडणुकांच्या ड्युटीवर असताना कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. (coronavirus allahabad hc says govt employees should get compensation of 1 crore after corona death) 

कोरोनाचा प्रसार आणि क्वारंटाइन सेंटरची स्थिती यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्या. सिद्धार्थ वर्मा आणि न्या. अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, निवडणुकांच्या ड्युटीवर असलेल्या अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. याबाबतीत भाष्य करताना निवडणुकांच्या ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांना १ कोटींची भरपाई मिळायला हवी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

राज्य सरकार, निवडणूक आयोगाने विचार करावा

उच्च न्यायालयाने यासंदर्भात कोणताही आदेश वा निर्देश दिलेले नाहीत. मात्र, यासंदर्भात मत व्यक्त केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करण्यात आली. त्यामुळे भरपाईची रक्कम १ कोटींपर्यंत हवी. निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी यावर विचार करावा, अशी अपेक्षा आहे, असे सांगत निवडणूक आयोगाना उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. 

रुग्णालयाने आकडे कमी दाखवू नयेत

मेरठ येथील एका रुग्णालयात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णालयांना कोरोना मृत्यू कमी दाखवण्याची मुभा नाही, तसे दाखवूही नयेत, असे स्पष्ट मत न्यायालयाने यावेळी नोंदवले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्या २० मृत्यूंबद्दल सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत ३ लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच देशात आताच्या घडीला ३७ लाख ०४ हजार ०९९ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर, १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेशHigh Courtउच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथ