शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:27 IST

ही विशेष विमानसेवा म्हणजे देशांतर्गत विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची नांदी आहे असे कोणीही समजू नये असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : देश लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना, एअर इंडियाने १९ मे ते २ जून या कालावधीत मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोची, जयपूर या शहरांतून विशेष विमाने सोडण्याचे ठरविले आहे. कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांत अडकून पडलेल्यांना त्यांच्या इच्छितस्थळी नेण्यासाठी ही विशेष विमानसेवा असेल.ही विशेष विमानसेवा म्हणजे देशांतर्गत विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची नांदी आहे असे कोणीही समजू नये असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या शहरी नेऊन पोहोचविण्यासाठी एअर इंडिया विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचा हा दुसरा टप्पा आहे. देशांतर्गत विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाला पाहिजे. विशेष विमानसेवेची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल व प्रवाशांना तिकिटांचे आॅनलाइन बुकिंग करता येईल. एअर इंडियाचा एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने या कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले आहे. या कंपनीच्या पाच पायलटनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते. पण दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत या पाच जणांना संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नेमके त्याच वेळेला एअर इंडियाच्या विशेष विमानसेवेची घोषणा झाली आहे. अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वे खात्यानेविशेष रेल्वेगाड्या चालविल्या असून त्यात धर्तीवर एअर इंडियाने निर्णय घेतला आहे.असा आहे विशेष विमानसेवेचा आराखडाएअर इंडियाच्या विशेष विमानसेवेच्या अंतर्गत दिल्लीहून जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनौ या शहरासांठी विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा येथे तर हैदराबादहून दिल्ली, मुंबईसाठी विमाने रवाना होतील. बंगळुरूहून मुंबई, दिल्ली, हैदराबादला विमाने जातील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडिया