शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: २०२० मध्ये भारतात ८२ लाख लोकांचा मृत्यू, त्यापैकी एवढे कोरोनाबळी, धक्कादायक आकडेवारी समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 10:22 IST

Coronavirus In India: गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली -  गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात ८१.२ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०१९ च्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी अधिक होते. २०१९ मध्ये भारतात ७६.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०२०२ मध्ये कोरोनामुळे भारतात १ लाख ४८ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर २०२१ मध्ये तब्बल ३ लाख ३२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२० पासून आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ५ लाख २३ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाकाळात देशात मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. तसेच २०१९ च्या ७६.४ लाखांवरून ते ८१.२ लाखांपर्यंत पोहोचल्याचे दिसले.

महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि हरियाणा येथील मृत्यूचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढलेले दिसले. या राज्यांमध्ये कोरोनामुळे बहुतांश मृत्यू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या काळातील जन्मनोंदणीवरून देशातील जन्मदर घटल्याचे दिसून आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदरात २.४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये भारतात २ कोटी ४८ लाख मुलांच्या जन्माची नोंद झाली होती. तर २०२० मध्ये २ कोटी ४२ लाख जन्मांची नोंद झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार