शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

Coronavirus: २०२० मध्ये भारतात ८२ लाख लोकांचा मृत्यू, त्यापैकी एवढे कोरोनाबळी, धक्कादायक आकडेवारी समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 10:22 IST

Coronavirus In India: गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली -  गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात ८१.२ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०१९ च्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी अधिक होते. २०१९ मध्ये भारतात ७६.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०२०२ मध्ये कोरोनामुळे भारतात १ लाख ४८ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर २०२१ मध्ये तब्बल ३ लाख ३२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२० पासून आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ५ लाख २३ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाकाळात देशात मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. तसेच २०१९ च्या ७६.४ लाखांवरून ते ८१.२ लाखांपर्यंत पोहोचल्याचे दिसले.

महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि हरियाणा येथील मृत्यूचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढलेले दिसले. या राज्यांमध्ये कोरोनामुळे बहुतांश मृत्यू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या काळातील जन्मनोंदणीवरून देशातील जन्मदर घटल्याचे दिसून आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदरात २.४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये भारतात २ कोटी ४८ लाख मुलांच्या जन्माची नोंद झाली होती. तर २०२० मध्ये २ कोटी ४२ लाख जन्मांची नोंद झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार