शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ७८ टक्के महाराष्ट्रासह चार राज्यातील रुग्ण; मुंबई, दिल्लीला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 01:11 IST

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३९०  नवे रुग्ण देशात आढळले, तर १०३  जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ५६३४२ झाली आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या समृद्ध व दाट लोकसंख्या असलेल्या चार राज्यांमध्येच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ७८ टक्के रुग्ण केवळ याच चार राज्यांत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात व तामिळनाडूत दररोज नवे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

चारही राज्यांना व्यापारी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्व असल्याने अर्थकारणही संकटात सापडले असून, आता त्यावर अर्थ मंत्रालयात बैठका सुरू आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे अन्य १३ राज्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. गेल्या ७ ते १३ दिवसांमध्ये एकही नव्या कोरोनाबाधिताचे निदान न झाल्याने १८० जिल्ह्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.एम्सच्या संचालकांनी जुलै मध्यात भारतात रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असल्याचे भाकित वर्तवले असले तरी सद्यस्थितीत आपण ही वाढ रोखू शकू , असा विश्वास आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला. केवळ तीनच दिवसात १० हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने आता केंद्र व राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर अद्याप आटोक्यात आला नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टसिंग, संपर्क तपासणे, तात्काळ चाचणी करणे यावर भर द्यायला हवा, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सुचवले. मात्र एकही चूक संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फेरेल, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमधील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.अनेक तज्ज्ञ, संस्थांनी भारतात कोरोना प्रसाराचा अभ्यास केला. काही अदांज वर्तवले. त्याचे विश्लेषण एका विशिष्ट स्थितीवर आधारीत आहे. सद्यस्थितीत हे सारे अदांज असले.गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३९०  नवे रुग्ण देशात आढळले, तर १०३  जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या५६३४२ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र