शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Coronavirus : नागावमधील ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद, पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसची संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 03:22 IST

जगभरात कोरोनाच्या विषाणूने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत १६३ देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रायगड जिल्हा विशेषत: अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. येथील नागावची ओळख कॉटेजचे गाव अशी आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पर्यटकांचा राबता असतो. गो कोरोना...गो... यामाध्यमातून नागाव परिसरातील तब्बल ५०० कॉटेज, हॉटेल्स आणि परमिट रूम बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रोजगारावर कोरोना व्हायरसची संक्रांत आल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.जगभरात कोरोनाच्या विषाणूने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत १६३ देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याचा आकडा वाढत आहे. एक लाख ९६ हजार ७२३ हून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी सात हजार ९२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ८१ हजार ६८३ कोरोनाग्रस्त बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरानाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने चीन या देशाला झाला आहे. त्यापाठोपाठ इटली, इराण, स्पेन आणि द. कोरिया यांना जास्त फटका बसला आहे.जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत तातडीने पावले उचलली आहेत. गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन सातत्याने राज्य तसेच जिल्हा पातळीवरून करण्यात येत आहे. कोरोनाबाबत सतर्कता हाच प्रामुख्याने आणि मोठा उपाय असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने १९९७ सालच्या साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, पर्यटनस्थळे, जलतरण तलाव, जिम, शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारी कार्यक्रम, सभा, समारंभ अशा कार्यक्रमांवरही बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात पर्यटनावर आधारित विविध व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांनाही आता मज्जाव करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे मोठ्या संख्येने कॉटेजेस, रेस्टारंट, हॉटेल्स आणि परमिट रूम आहेत, त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने अशा व्यवसायांवर बंदी घालणे गरजेचेहोेते.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागाव ग्रामपंचायतीने लॉजेस, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक यांची बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लॉजेस, रिसॉर्ट बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला आहे. सुमारे ५०० हॉटेल्स, लॉज, कॉटेजेस, रेस्टारंट बंद केली आहेत. त्यामुळे गजबजलेला नागाव परिसर हा सुनासुना झाला आहे, तर येणाऱ्या तुरळक पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.जिल्ह्यात पर्यटनाला मोठा फटकाजिल्ह्यातील पर्यटनाला कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू लागला आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारे ही आता निर्मनुष्य दिसू लागले आहेत. नेहमी गजबजलेले नागाव सध्या पर्यटकांविना सुनेसुने झाले आहे. शनिवार, रविवार आणि सलग लागून सुट्ट्या आल्या की मुंबई, पुणे, ठाणे येथून नागाव समुद्रकिनाºयावर पर्यटक मजा करण्यासाठी वाहनाने आणि जलवाहतुकीने येत असतात. त्यामुळे नागाव व आजूबाजूचा परिसर समुद्रकिनारे, हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्टही पर्यटकांनी गजबजून जातात. पर्यटकांमुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र, कोरोना विषाणूमुळे सध्या पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यावर आधारित असणारे व्यावसायिक चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.नागाव समुद्रकिनाºयावर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. वीकेण्डला हजारो पर्यटक मौजमजेसाठी येथे येत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता ३१ मार्चपर्यंत नागाव गावातील ग्रामस्थांना आपापले कॉटेज व हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देत सुमारे ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद ठेवले आहेत.- निखिल मयेकर, नागाव, सरपंचप्रशासनाचा निर्णय योग्यजिल्ह्यातील अलिबाग, मुरु ड, श्रीवर्धन या ठिकाणच्या सर्वच समुद्रकिनारी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा फटका हा पर्यटन व्यवसायाला बसू लागला आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांच्या आरोग्य दृष्टीने घेतलेला जिल्हा प्रशासनाचा निर्णय हा योग्य असल्याचे मत हॉटेल व्यावसायिक दिनकर कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड