शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 12:24 IST

Coronavirus : लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात 3 मे पर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र याच दरम्यान फोनशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फोन विक्रीवर लावलेली बंदी आणि मोबाईल फोन दुरुस्त करणारी दुकाने बंद आहेत. बंदी हटवली गेली नाहीतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल अशी माहिती मिळत आहे.

इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (ICEA) शुक्रवारी (24 एप्रिल) लॉकडाऊनमध्ये बंदी अशीच कायम राहिल्यास मे महिनाच्या शेवटी देशातील चार कोटी मोबाईल युजर्सचे मोबाईल न वापरण्यासारखे होतील अशी भीती व्यक्त केली आहे. आयसीईएने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक लोकांशी संपर्क करून मोबाईल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे. तसेच मोबाईल नसेल तर अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहावे लागेल म्हणूनच मोबाईलचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा असं त्यांनी म्हटलं आहे. 

'भारतीय मोबाईल बाजारपेठ मोठी आहे. महिन्याला एकूण मोबाईल्सपैकी 0.25 टक्के प्रकरणे ही मोबाईल बंद होण्यासंदर्भातील असतात. सध्या भारतामध्ये 85 कोटी मोबाईल युजर्स आहेत. त्यामुळे या घडीला अडीच कोटी मोबाईल युजर्सचे फोन बिघडले असूनही त्यांना नवीन फोनची देखील खरेदी करता येत नाही. मोबाईल विक्रीवर घालण्यात आलेली बंदी आणि दुरुस्तीची दुकाने बंद असणे ही यामागील दोन प्रमुख कारणे आहेत' असं आयसीईएने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्मार्टफोन सध्याची गरज झाली असून लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्याच हातात तो हमखास दिसतो. अनेक ठिकाणी स्मार्टफोन हा ठेवला जातो. सध्या कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत असताना कोरोना व्हायरस स्मार्टफोनवर किती वेळ राहू शकतो याबाबत अनेक युजर्सकडून प्रश्न विचारला जात होता. या संदर्भात आता एक रिसर्च समोर आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका अभ्यासानुसार, ओरिजनल SARS-CoV एक ग्लास सर्फेसवर 96 तास म्हणजेच 4 दिवस जिवंत राहू शकतो. सार्सप्रमाणे कोरोना देखील ग्लास सर्फेसवर 4 दिवस जिवंत राहू शकतो. फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपसारख्या ग्लास सर्फेस असलेल्या उपकरणांवर देखील कोरोना जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्मार्टफोन हा वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान