शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 12:24 IST

Coronavirus : लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात 3 मे पर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र याच दरम्यान फोनशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फोन विक्रीवर लावलेली बंदी आणि मोबाईल फोन दुरुस्त करणारी दुकाने बंद आहेत. बंदी हटवली गेली नाहीतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल अशी माहिती मिळत आहे.

इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (ICEA) शुक्रवारी (24 एप्रिल) लॉकडाऊनमध्ये बंदी अशीच कायम राहिल्यास मे महिनाच्या शेवटी देशातील चार कोटी मोबाईल युजर्सचे मोबाईल न वापरण्यासारखे होतील अशी भीती व्यक्त केली आहे. आयसीईएने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक लोकांशी संपर्क करून मोबाईल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे. तसेच मोबाईल नसेल तर अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहावे लागेल म्हणूनच मोबाईलचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा असं त्यांनी म्हटलं आहे. 

'भारतीय मोबाईल बाजारपेठ मोठी आहे. महिन्याला एकूण मोबाईल्सपैकी 0.25 टक्के प्रकरणे ही मोबाईल बंद होण्यासंदर्भातील असतात. सध्या भारतामध्ये 85 कोटी मोबाईल युजर्स आहेत. त्यामुळे या घडीला अडीच कोटी मोबाईल युजर्सचे फोन बिघडले असूनही त्यांना नवीन फोनची देखील खरेदी करता येत नाही. मोबाईल विक्रीवर घालण्यात आलेली बंदी आणि दुरुस्तीची दुकाने बंद असणे ही यामागील दोन प्रमुख कारणे आहेत' असं आयसीईएने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्मार्टफोन सध्याची गरज झाली असून लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्याच हातात तो हमखास दिसतो. अनेक ठिकाणी स्मार्टफोन हा ठेवला जातो. सध्या कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत असताना कोरोना व्हायरस स्मार्टफोनवर किती वेळ राहू शकतो याबाबत अनेक युजर्सकडून प्रश्न विचारला जात होता. या संदर्भात आता एक रिसर्च समोर आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका अभ्यासानुसार, ओरिजनल SARS-CoV एक ग्लास सर्फेसवर 96 तास म्हणजेच 4 दिवस जिवंत राहू शकतो. सार्सप्रमाणे कोरोना देखील ग्लास सर्फेसवर 4 दिवस जिवंत राहू शकतो. फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपसारख्या ग्लास सर्फेस असलेल्या उपकरणांवर देखील कोरोना जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्मार्टफोन हा वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान