शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 12:24 IST

Coronavirus : लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात 3 मे पर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र याच दरम्यान फोनशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फोन विक्रीवर लावलेली बंदी आणि मोबाईल फोन दुरुस्त करणारी दुकाने बंद आहेत. बंदी हटवली गेली नाहीतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल अशी माहिती मिळत आहे.

इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (ICEA) शुक्रवारी (24 एप्रिल) लॉकडाऊनमध्ये बंदी अशीच कायम राहिल्यास मे महिनाच्या शेवटी देशातील चार कोटी मोबाईल युजर्सचे मोबाईल न वापरण्यासारखे होतील अशी भीती व्यक्त केली आहे. आयसीईएने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक लोकांशी संपर्क करून मोबाईल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे. तसेच मोबाईल नसेल तर अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहावे लागेल म्हणूनच मोबाईलचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा असं त्यांनी म्हटलं आहे. 

'भारतीय मोबाईल बाजारपेठ मोठी आहे. महिन्याला एकूण मोबाईल्सपैकी 0.25 टक्के प्रकरणे ही मोबाईल बंद होण्यासंदर्भातील असतात. सध्या भारतामध्ये 85 कोटी मोबाईल युजर्स आहेत. त्यामुळे या घडीला अडीच कोटी मोबाईल युजर्सचे फोन बिघडले असूनही त्यांना नवीन फोनची देखील खरेदी करता येत नाही. मोबाईल विक्रीवर घालण्यात आलेली बंदी आणि दुरुस्तीची दुकाने बंद असणे ही यामागील दोन प्रमुख कारणे आहेत' असं आयसीईएने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्मार्टफोन सध्याची गरज झाली असून लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्याच हातात तो हमखास दिसतो. अनेक ठिकाणी स्मार्टफोन हा ठेवला जातो. सध्या कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत असताना कोरोना व्हायरस स्मार्टफोनवर किती वेळ राहू शकतो याबाबत अनेक युजर्सकडून प्रश्न विचारला जात होता. या संदर्भात आता एक रिसर्च समोर आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका अभ्यासानुसार, ओरिजनल SARS-CoV एक ग्लास सर्फेसवर 96 तास म्हणजेच 4 दिवस जिवंत राहू शकतो. सार्सप्रमाणे कोरोना देखील ग्लास सर्फेसवर 4 दिवस जिवंत राहू शकतो. फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपसारख्या ग्लास सर्फेस असलेल्या उपकरणांवर देखील कोरोना जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्मार्टफोन हा वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान