शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

coronavirus: देशात एकूण रुग्णसंख्या ३७ लाखांवर; कोरोना रुग्णांचा १.७६ टक्के मृत्यूदर जगात सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:50 IST

भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांचा जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात असून, तो १.७६ टक्के आहे. भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे. देशात कोरोनाचे बुधवारी ७८,३५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३७ लाखांहून अधिक झाली आहे.देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७६.९८ टक्के झाले असून, अशा व्यक्तींची एकूण संंख्या २९,०१,९०८ झाली आहे. जगामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ३.३ टक्के आहे. भारताच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाºयांची संख्या ब्रिटन, ब्राझीलमध्ये १२ ते १३ पट अधिक आहे. जागतिक स्तरावर दर दहा लाख लोकांमागे ११० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.देशामध्ये कोरोनामुळे बुधवारी १,०४५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ६६,३३३ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३७,६९,५२३ झाली आहे. सध्या ८,०१,२८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण २१.२६ टक्के आहे.भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ आॅगस्ट रोजी ओलांडला होता. त्यानंतर ही संख्या २३ आॅगस्ट रोजी ३० लाखांपेक्षा अधिक झाली होती.कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,४१८, कर्नाटकात ५,८३७, आंध्र प्रदेशमध्ये ४,०५३, उत्तर प्रदेशमध्ये ३,५४२, पश्चिम बंगालमध्ये ३,२८३, गुजरातमध्ये ३,०३४, पंजाबमध्ये १,५१२ इतकी आहे.कोरोना चाचण्यांची संख्या ४ कोटी ४३ लाखांवरइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर रोजी १०,१२,३६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,४३,३७,२०१ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत