शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

coronavirus: देशात एकूण रुग्णसंख्या ३७ लाखांवर; कोरोना रुग्णांचा १.७६ टक्के मृत्यूदर जगात सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:50 IST

भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांचा जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात असून, तो १.७६ टक्के आहे. भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे. देशात कोरोनाचे बुधवारी ७८,३५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३७ लाखांहून अधिक झाली आहे.देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७६.९८ टक्के झाले असून, अशा व्यक्तींची एकूण संंख्या २९,०१,९०८ झाली आहे. जगामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ३.३ टक्के आहे. भारताच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाºयांची संख्या ब्रिटन, ब्राझीलमध्ये १२ ते १३ पट अधिक आहे. जागतिक स्तरावर दर दहा लाख लोकांमागे ११० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.देशामध्ये कोरोनामुळे बुधवारी १,०४५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ६६,३३३ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३७,६९,५२३ झाली आहे. सध्या ८,०१,२८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण २१.२६ टक्के आहे.भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ आॅगस्ट रोजी ओलांडला होता. त्यानंतर ही संख्या २३ आॅगस्ट रोजी ३० लाखांपेक्षा अधिक झाली होती.कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,४१८, कर्नाटकात ५,८३७, आंध्र प्रदेशमध्ये ४,०५३, उत्तर प्रदेशमध्ये ३,५४२, पश्चिम बंगालमध्ये ३,२८३, गुजरातमध्ये ३,०३४, पंजाबमध्ये १,५१२ इतकी आहे.कोरोना चाचण्यांची संख्या ४ कोटी ४३ लाखांवरइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर रोजी १०,१२,३६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,४३,३७,२०१ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत