शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

coronavirus: देशात एकूण रुग्णसंख्या ३७ लाखांवर; कोरोना रुग्णांचा १.७६ टक्के मृत्यूदर जगात सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:50 IST

भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांचा जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात असून, तो १.७६ टक्के आहे. भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे. देशात कोरोनाचे बुधवारी ७८,३५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३७ लाखांहून अधिक झाली आहे.देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७६.९८ टक्के झाले असून, अशा व्यक्तींची एकूण संंख्या २९,०१,९०८ झाली आहे. जगामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ३.३ टक्के आहे. भारताच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाºयांची संख्या ब्रिटन, ब्राझीलमध्ये १२ ते १३ पट अधिक आहे. जागतिक स्तरावर दर दहा लाख लोकांमागे ११० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.देशामध्ये कोरोनामुळे बुधवारी १,०४५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ६६,३३३ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३७,६९,५२३ झाली आहे. सध्या ८,०१,२८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण २१.२६ टक्के आहे.भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ आॅगस्ट रोजी ओलांडला होता. त्यानंतर ही संख्या २३ आॅगस्ट रोजी ३० लाखांपेक्षा अधिक झाली होती.कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,४१८, कर्नाटकात ५,८३७, आंध्र प्रदेशमध्ये ४,०५३, उत्तर प्रदेशमध्ये ३,५४२, पश्चिम बंगालमध्ये ३,२८३, गुजरातमध्ये ३,०३४, पंजाबमध्ये १,५१२ इतकी आहे.कोरोना चाचण्यांची संख्या ४ कोटी ४३ लाखांवरइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर रोजी १०,१२,३६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,४३,३७,२०१ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत