शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात लग्न करून फसले; २२ दिवस ३२ जण शाळेतच अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:03 IST

२२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. 

छपरा: लॉकडाऊन असल्यानं लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. लॉकडाऊनच्या काळातील बरीच लग्न रद्द करण्यात आली आहेत. पण काही असेही उत्साही लोक आहेत, त्यांनी या काळातही लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोलकात्याहून आलेली ३२ वऱ्हाडी मंडळी बिहारमधल्या छपरा गावात अडकून पडली आहेत. या मंडळींनी पुन्हा कोलकात्यात परतण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. आता त्यांच्याजवळ दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नाहीत. मुलीच्या गावातील आजूबाजूचे लोक त्यांना दोन वेळेचं जेवण देत आहेत. कारण वधूचं कुटुंबसुद्धा गरीब आहे.  २२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. मांझीच्या इनायतपूर गावात कोलकाताहून फिरोज अख्तर लग्नाची वरात घेऊन आले. ज्याचं लग्न खुशबू खातून हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं संपन्न  झालं. पण लग्नाच्या पुढच्याच दिवशी २३ मार्चला पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे कोलकात्याहून आलेली वऱ्हाडी मंडळी गावातच अडकून पडली. वऱ्हाडी मंडळींमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. मुलीकडच्यांनी या मंडळींची गावातील एका शाळेत व्यवस्था केली आहे. ३२ लोकांना दोन वेळेचं दररोज जेवण देणं हे मुलीकडच्यांच्या आवाक्यातील नाही. वधूसुद्धा वऱ्हाडी मंडळींबरोबर शाळेत राहत आहे. या कठीण काळात मांझीच्या लोकांनी त्यांना खूप मदत केली आहे. ज्या दिवशी वऱ्हाडी मंडळी गावात आली, लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना निरोप घ्यायचा होता, परंतु त्याचदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. वरात कोलकाताहून छपरा येथील मांझी येथे मिरवणुकीसाठी आली असता लॉकडाऊनमुळे ट्रेनसह रस्त्यांची वाहतूकही बंद झाली होती. त्यामुळे वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींना गावाबाहेरच्या शाळेत ठेवले. वऱ्हाडी मंडळींनी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना झारखंडच्या सीमेवरून परत मागे पाठवण्यात आलं. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या