शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात लग्न करून फसले; २२ दिवस ३२ जण शाळेतच अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:03 IST

२२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. 

छपरा: लॉकडाऊन असल्यानं लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. लॉकडाऊनच्या काळातील बरीच लग्न रद्द करण्यात आली आहेत. पण काही असेही उत्साही लोक आहेत, त्यांनी या काळातही लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोलकात्याहून आलेली ३२ वऱ्हाडी मंडळी बिहारमधल्या छपरा गावात अडकून पडली आहेत. या मंडळींनी पुन्हा कोलकात्यात परतण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. आता त्यांच्याजवळ दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नाहीत. मुलीच्या गावातील आजूबाजूचे लोक त्यांना दोन वेळेचं जेवण देत आहेत. कारण वधूचं कुटुंबसुद्धा गरीब आहे.  २२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. मांझीच्या इनायतपूर गावात कोलकाताहून फिरोज अख्तर लग्नाची वरात घेऊन आले. ज्याचं लग्न खुशबू खातून हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं संपन्न  झालं. पण लग्नाच्या पुढच्याच दिवशी २३ मार्चला पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे कोलकात्याहून आलेली वऱ्हाडी मंडळी गावातच अडकून पडली. वऱ्हाडी मंडळींमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. मुलीकडच्यांनी या मंडळींची गावातील एका शाळेत व्यवस्था केली आहे. ३२ लोकांना दोन वेळेचं दररोज जेवण देणं हे मुलीकडच्यांच्या आवाक्यातील नाही. वधूसुद्धा वऱ्हाडी मंडळींबरोबर शाळेत राहत आहे. या कठीण काळात मांझीच्या लोकांनी त्यांना खूप मदत केली आहे. ज्या दिवशी वऱ्हाडी मंडळी गावात आली, लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना निरोप घ्यायचा होता, परंतु त्याचदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. वरात कोलकाताहून छपरा येथील मांझी येथे मिरवणुकीसाठी आली असता लॉकडाऊनमुळे ट्रेनसह रस्त्यांची वाहतूकही बंद झाली होती. त्यामुळे वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींना गावाबाहेरच्या शाळेत ठेवले. वऱ्हाडी मंडळींनी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना झारखंडच्या सीमेवरून परत मागे पाठवण्यात आलं. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या