शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात लग्न करून फसले; २२ दिवस ३२ जण शाळेतच अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:03 IST

२२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. 

छपरा: लॉकडाऊन असल्यानं लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. लॉकडाऊनच्या काळातील बरीच लग्न रद्द करण्यात आली आहेत. पण काही असेही उत्साही लोक आहेत, त्यांनी या काळातही लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोलकात्याहून आलेली ३२ वऱ्हाडी मंडळी बिहारमधल्या छपरा गावात अडकून पडली आहेत. या मंडळींनी पुन्हा कोलकात्यात परतण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. आता त्यांच्याजवळ दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नाहीत. मुलीच्या गावातील आजूबाजूचे लोक त्यांना दोन वेळेचं जेवण देत आहेत. कारण वधूचं कुटुंबसुद्धा गरीब आहे.  २२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. मांझीच्या इनायतपूर गावात कोलकाताहून फिरोज अख्तर लग्नाची वरात घेऊन आले. ज्याचं लग्न खुशबू खातून हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं संपन्न  झालं. पण लग्नाच्या पुढच्याच दिवशी २३ मार्चला पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे कोलकात्याहून आलेली वऱ्हाडी मंडळी गावातच अडकून पडली. वऱ्हाडी मंडळींमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. मुलीकडच्यांनी या मंडळींची गावातील एका शाळेत व्यवस्था केली आहे. ३२ लोकांना दोन वेळेचं दररोज जेवण देणं हे मुलीकडच्यांच्या आवाक्यातील नाही. वधूसुद्धा वऱ्हाडी मंडळींबरोबर शाळेत राहत आहे. या कठीण काळात मांझीच्या लोकांनी त्यांना खूप मदत केली आहे. ज्या दिवशी वऱ्हाडी मंडळी गावात आली, लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना निरोप घ्यायचा होता, परंतु त्याचदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. वरात कोलकाताहून छपरा येथील मांझी येथे मिरवणुकीसाठी आली असता लॉकडाऊनमुळे ट्रेनसह रस्त्यांची वाहतूकही बंद झाली होती. त्यामुळे वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींना गावाबाहेरच्या शाळेत ठेवले. वऱ्हाडी मंडळींनी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना झारखंडच्या सीमेवरून परत मागे पाठवण्यात आलं. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या