शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नांदेडमधून पंजाबला गेलेले १७० भाविक कोरोना पॉझिटिव्ह, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 12:03 IST

नांदेड येथून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कोरोना चाचणी केली नाहीया प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

चंदिगड - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर, प्रवासी आणि भाविक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा व्यक्तींना त्या्ंच्या घरी पाठवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अशा प्रकारचे स्थलांतर हे एकप्रकारे नवे संकट ठरण्याची शक्यता आहे. नुकतेच महाराष्ट्रातील नांदे़ड येथे अडकलेल्या हजारो शीख भाविकांना पंजाब सरकारने विशेष बसमधून आपल्या राज्यात परत नेले होते. मात्र या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे. त्यातच पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकारबाबत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान अकाली दलानेच नांदेड येथे अडकलेल्या भाविकांचा प्रश्न उपस्थित केला होता. नांदेडहून भाविक पंजाबमध्ये परतल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली नाही. तसेच त्यांना क्वारेंटाइन करण्याबाबतही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या चुकीबद्दल आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अकाली दलाच्या नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, देशातील इतर काही राज्यांप्रमाणे पंजाबमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPunjabपंजाबNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र