शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

नांदेडमधून पंजाबला गेलेले १७० भाविक कोरोना पॉझिटिव्ह, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 12:03 IST

नांदेड येथून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कोरोना चाचणी केली नाहीया प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

चंदिगड - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर, प्रवासी आणि भाविक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा व्यक्तींना त्या्ंच्या घरी पाठवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अशा प्रकारचे स्थलांतर हे एकप्रकारे नवे संकट ठरण्याची शक्यता आहे. नुकतेच महाराष्ट्रातील नांदे़ड येथे अडकलेल्या हजारो शीख भाविकांना पंजाब सरकारने विशेष बसमधून आपल्या राज्यात परत नेले होते. मात्र या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे. त्यातच पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकारबाबत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान अकाली दलानेच नांदेड येथे अडकलेल्या भाविकांचा प्रश्न उपस्थित केला होता. नांदेडहून भाविक पंजाबमध्ये परतल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली नाही. तसेच त्यांना क्वारेंटाइन करण्याबाबतही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या चुकीबद्दल आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अकाली दलाच्या नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, देशातील इतर काही राज्यांप्रमाणे पंजाबमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPunjabपंजाबNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र