शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ... तर चीनला मोठा फटका बसणार, तब्बल 1000 कंपन्या भारतात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 11:19 IST

Coronavirus : जागतिक कंपन्यांची उत्पादनासाठी पहिली पसंती ही नेहमीच चीनला असते.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख 30 हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे 6 लाख 38 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने 1 लाख 66 हजार जणांचा बळीही घेतला आहे. मोठमोठ्या कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला असून आर्थिक नुकसान झालं आहे. जागतिक कंपन्यांची उत्पादनासाठी पहिली पसंती ही नेहमीच चीनला असते. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे चीनमधील जवळपास 1000 हजार कंपन्या भारतात येण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे.

भारतात आपले कारखाने उभे करण्यासाठी या कंपन्यांनी सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. बिजनेस टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, कमीत कमी 300 मोबाईल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, टेक्सटाईल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स क्षेत्रातील कंपन्या भारतात कारखाने उभारण्यासाठी सरकारशी सक्रीय स्वरुपात संपर्कात आहेत. या कंपन्यांशी चर्चा यशस्वी झाली. तर चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

भारत हा आगामी काळात उत्पादन क्षेत्रात पर्यायी हब ठरू शकतो असा या कंपन्यांचा दृष्टीकोन आहे. यामुळे सरकारकडे विविध पातळ्यांवर आपला प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यात विदेशातील भारतीय दुतावास आणि विविध राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जवळपास 1000 कंपन्या वेगवेगळ्या स्तरांवर जसे इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल सेल, सेंट्रल गव्हर्नमेंट डिपोर्टमेट्स आणि राज्य सरकारांशी चर्चा करत आहेत. यापैकी 300 कंपन्यांवर अधिक लक्ष केंद्रीय केलं आहे. 

कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्यावर आपल्यासाठी अनेक फायदेशीर गोष्टी समोर येतील. भारत हा उत्पादन क्षेत्रातील एक मोठा पर्याय म्हणून जागतिक पातळीवर समोर येईल. जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासारखे देश चीनवर प्रमाणपेक्षा अधिक अवलंबून आहे आणि हे स्पष्टपणे दिसतं असल्याचं देखील अधिकाऱ्याने म्हटलं आहे. देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार गेल्या सप्टेंबरपासून मोठे निर्णय घेत आहे. कॉर्पोरेट करात कपात करून 25.17 टक्क्यांवर आणला आहे. नवी कारखाने उभे करणाऱ्यांचा कॉर्पोरेट कर कमी करून 17  टक्के केला आहे. हा कर दक्षिण पूर्व आशियात सर्वांत कमी आहे. कॉर्पोरेट करातील कपातीसबोतच देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे देशातील उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक भारताला अपेक्षित आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

Coronavirus : 'माझ्या वडिलांना वाचवा'... लेकीची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विनवणी; Video पाहून व्हाल भावूक

Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली

CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनbusinessव्यवसाय