शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

CoronaVaccine: देशात एकाच दिवसात १.०९ कोटी लोकांचे लसीकरण; ५ दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:25 IST

लसीकरण पोहोचले ६५ कोटींवर

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूला रोखणाऱ्या लसीकरणाने देशात पाच दिवसांत दुसऱ्यांदा मंगळवारी एक कोटींचा टप्पा ओलांडला. यामुळे आतापर्यंत एकूण ६५ कोटी लोकांचे लसीकरण झाले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ट्विटरवर म्हणाले की, “मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १.०९ कोटी लोकांना लस दिली गेली होती. ५० कोटी लोकांना लसीची पहिला मात्रा दिली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश समर्थपणे कोरोनाशी लढत आहे.”

भारताने १० कोटीचा टप्पा गाठण्यास ८५ दिवस घेतले. नंतरच्या ४५ दिवसांत २० कोटी आणि ३० कोटीची पायरी गाठण्यास २९ दिवस लागले. २४ दिवसांत ४० कोटीचा आणि आणखी २० दिवसांत ५० कोटींचा टप्पा ६ ऑगस्ट रोजी ओलांडला. आणखी १९ दिवसांनी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी ६० कोटीचा पल्ला गाठला. देशात १६ जानेवारी, २०२१ रोजी लसीकरणास सुरुवात झाली. तेव्हा आराेग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस दिली गेली. दोन फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले.

लसीकरणाचा दुसरा टप्पा ६० वर्षांच्या वरील आणि सह आजार असलेल्या ४५ वयाच्या पुढच्या लोकांसाठी एक मार्चपासून सुरू झाला. एक एप्रिलपासून देशात ४५ वर्षे वयाच्या पुढील सर्वांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली. त्यानंतर सरकारने एक मेपासून १८ वर्षांच्या पुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला.

२४ तासांत देशात कोरोनाचे ३५० मृत्यू

देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३०,९४१ रुग्ण आढळले, तर ३५० जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या आता ४,३८,५६० झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ३,७०,६४० झाली आहे. एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.१३ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत मंगळवारी सकाळपर्यंत ६४.०५ कोटी लोकांना कोविड १९ विषाणूवरील लस दिली गेली, असेही निवेदनात म्हटले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारत