शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine: देशात एकाच दिवसात १.०९ कोटी लोकांचे लसीकरण; ५ दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:25 IST

लसीकरण पोहोचले ६५ कोटींवर

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूला रोखणाऱ्या लसीकरणाने देशात पाच दिवसांत दुसऱ्यांदा मंगळवारी एक कोटींचा टप्पा ओलांडला. यामुळे आतापर्यंत एकूण ६५ कोटी लोकांचे लसीकरण झाले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ट्विटरवर म्हणाले की, “मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १.०९ कोटी लोकांना लस दिली गेली होती. ५० कोटी लोकांना लसीची पहिला मात्रा दिली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश समर्थपणे कोरोनाशी लढत आहे.”

भारताने १० कोटीचा टप्पा गाठण्यास ८५ दिवस घेतले. नंतरच्या ४५ दिवसांत २० कोटी आणि ३० कोटीची पायरी गाठण्यास २९ दिवस लागले. २४ दिवसांत ४० कोटीचा आणि आणखी २० दिवसांत ५० कोटींचा टप्पा ६ ऑगस्ट रोजी ओलांडला. आणखी १९ दिवसांनी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी ६० कोटीचा पल्ला गाठला. देशात १६ जानेवारी, २०२१ रोजी लसीकरणास सुरुवात झाली. तेव्हा आराेग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस दिली गेली. दोन फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले.

लसीकरणाचा दुसरा टप्पा ६० वर्षांच्या वरील आणि सह आजार असलेल्या ४५ वयाच्या पुढच्या लोकांसाठी एक मार्चपासून सुरू झाला. एक एप्रिलपासून देशात ४५ वर्षे वयाच्या पुढील सर्वांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली. त्यानंतर सरकारने एक मेपासून १८ वर्षांच्या पुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला.

२४ तासांत देशात कोरोनाचे ३५० मृत्यू

देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३०,९४१ रुग्ण आढळले, तर ३५० जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या आता ४,३८,५६० झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ३,७०,६४० झाली आहे. एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.१३ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत मंगळवारी सकाळपर्यंत ६४.०५ कोटी लोकांना कोविड १९ विषाणूवरील लस दिली गेली, असेही निवेदनात म्हटले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारत