शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Corona Virus : गेल्या 14 महिन्यांपासून केंद्र सरकार काय करतंय? हायकोर्टाचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:02 IST

Corona Virus : न्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय

ठळक मुद्देन्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय

चेन्नई - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. वर्षाच्या सुरुवातीला देशातील स्थिती नियंत्रणात होती. मात्र, चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी मोठमोठ्या सभा घेतल्या. यावरून मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर, आता मद्रास उच्च न्यायालयानेकेंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोरोना महामारीचं नियोजन आणि उपाय करण्यास सरकार असमर्थ ठरल्याचा ठपकाच न्यायालयाने ठेवला आहे. 

न्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय. आपल्याकडे गेल्या वर्षभरापासून वेळ होता, पण आता एप्रिल महिन्यातच आपण का सचोटीनं वागत आहोत. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन असतानाही तीच परिस्थिती का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी भारत सरकारचे मुख्य अॅटर्नी जनरल शंकरनारायणन यांना यासंदर्भात सवाल केला आहे.  सरकारच्यावतीने बोलताना शंकरनारायणनं यांनी, देशातील कोरोना रुग्णांची सध्याची वाढ अनपेक्षित होती, असे उत्तरादाखल म्हटले होते. त्यावर, मग गेल्या 14 महिन्यांपासून केंद्र सरकार काय करत होतं? असाही सवाल मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायमूर्ती सेंथीलकुमार राममूर्ती यांच्या खंडपीठाने केला आहे. 

निवडणूक आयोगावर हायकोर्टाचा संताप

राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिलीत, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीब बॅनर्जींनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगापुढे उपस्थित केला होता. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा शब्दांत न्यायालयानं संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे नियम धाब्यावर बसवले गेले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.

२ मे रोजी निकालानंतर रॅली व एकत्र येण्यास बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला होता. त्यानंतर, निवडणूक आयोगाने २ मे रोजी निवडणूक निकालानंतर जल्लोष रॅली आणि विजयी मिरवणुकांना बंदी घातली आहे. यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHigh Courtउच्च न्यायालयChennaiचेन्नईCentral Governmentकेंद्र सरकार