शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 09:16 IST

जेव्हा भारताने पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच पाकिस्तान दहशतीखाली आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरलेला असून, भारतही अनेक देशांना या संकटकाळात मदत करतो आहे. एखाद्या देशाला औषधाची आवश्यकता असल्यास भारत तातडीनं ती उपलब्ध करून देत आहे. जेव्हा भारताने पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच पाकिस्तान दहशतीखाली आहे.

नवी दिल्लीः जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरलेला असून, भारतही अनेक देशांना या संकटकाळात मदत करतो आहे. एखाद्या देशाला औषधाची आवश्यकता असल्यास भारत तातडीनं ती उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण याचदरम्यान पाकिस्तान हा भारताविरोधात गरळ ओकण्याचं काम करत आहे. भारत पुन्हा आमच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल, असा कांगावा पाकिस्तानकडून सुरू आहे. जेव्हा भारताने पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच पाकिस्तान दहशतीखाली आहे.

भारतानं पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. पीओके (पाकिस्तान व्याप्त काश्मीर) फक्त आमचे आहे, तिथले हवामानही आम्हीच वर्तवणार आहोत, असंही भारतानं पाकिस्तानला ठणकावलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळातही मोदींनी जम्मू-काश्मीरबद्दल भूमिका बदललेली नसून, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी प्लॅनही तयार केला आहे. कोरोना व्हायरसच्या युगातही पाकिस्तानला उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची मनस्थिती अजूनही तशीच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीची काही देशांच्या परिषदेत पंतप्रधानांनी दहशतवादाचा उल्लेख करत पाकिस्तानवर निशाणा साधला होता. काही लोक प्राणघातक विषाणू, खोट्या बातम्या अन् व्हिडिओ पसरविण्यात गुंतले आहेत, असंही मोदी म्हणाले होते. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताने पाकिस्तानला मदतीचा हात दिला होता. परंतु पाकिस्तानकडून दहशतवादी कृत्ये सुरूच असल्यानं मोदी सरकारनं त्यांना शेवटचा इशारा दिला आहे. पीओकेसमवेत काश्मीरचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला आता गिलगिट-बाल्टिस्तानवरही पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे. भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करतो की काय, अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटू लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलं होते की, " भारतामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे. काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना इम्रान खान यांनी स्थानिक घटना असल्याचं म्हटलं आहे. त्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.भारतीय हवामान खात्याने पाकिस्तानला इशारा दिला भारतीय हवामान खात्याने जम्मू-काश्मीरच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. त्याचबरोबर हवामान खात्याने जम्मू-काश्मीरच्या हवामान उपविभागाचा आकारही बदलला. उपविभागामध्ये जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादला स्थान देण्यात आले आहे. भारताने पाकव्याप्त  काश्मीरवरचा आपला दावा कधीही सोडलेला नव्हता. आता भारतानं उचललेली ही पावलं पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. हवामान खात्याने पीओकेसह गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानला निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. तेव्हा भारताने पाकिस्तानला स्पष्ट सांगितले होते की, हा पीओकेदेखील आमचा आहे आणि शक्य तितक्या लवकर तो रिकामा करावा. ज्या दिवशी भारताचे सैन्य पीओकेला पोहोचेल, तेव्हा काय होईल, अशी भीती आता पाकिस्तानला सतावते आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल

CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी