शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

corona virus : संपूर्ण देशात ऑक्सिजनची टंचाई; हे राज्य मात्र रुग्णांची गरज भागवून शेजारील राज्यांना पुरवतेय प्राणवायू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 11:43 IST

medical oxygen in India : ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. पण दक्षिणेतील केरळमध्ये मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देदेशभरात ऑक्सिजनसाठी धावपळ होत असली तरी केरळमध्ये सध्या मौल्यवान ठरत असलेल्या ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन होत आहेगरज पडली तर पुढच्या काळात अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता केरळकडे आहेघडीची आकडेवारी पाहिल्यास केरळ सध्या दररोज ७० मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि १६ मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला पुरवत आहे

तिरुवनंतपुरम - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. (corona virus in India) वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठीला लागणाऱ्या ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. (medical oxygen in India) ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. पण दक्षिणेतील केरळमध्ये मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी येथे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन (Oxygen Cylinder) मिळत असून, येथून शेजारील राज्यांनाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. (oxygen shortage throughout in India; however Kerala caters to the needs of the patients and supplies oxygen to the neighboring states)

सध्या देशभरात ऑक्सिजनसाठी धावपळ होत असली तरी केरळमध्ये सध्या मौल्यवान ठरत असलेल्या ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन होत आहे. एवढेच नाही तर गरज पडली तर पुढच्या काळात अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता या राज्याकडे आहे. या घडीची आकडेवारी पाहिल्यास केरळ सध्या दररोज ७० मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि १६ मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला पुरवत आहे.  डेप्युटी चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह अँड मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंग चे नोडल अधिकारी डॉ. आऱ वेणुगोपाल यांनी सांगितले की, कोविड केअरसाठी आम्हाला दररोज ३५ मेट्रिक टन ऑक्सिजन आणि नॉन कोविड केअरसाठी दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गजर आहे.  आमची एकूण क्षमता १९९ मेट्रिक टन प्रतिदिन आहे. तसेच गरज भासल्यास आम्ही आपली उत्पादन क्षमता अधिक वाढवू शकतो. 

केरळमध्ये ऑक्सिजनची टंचाई न जाणवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येथे रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र देशातील इतर राज्यांप्रमाणे येथील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नाही आहे. दुसरीकडे देशातील इतर राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. ''आम्ही प्राथमिक टप्प्यामध्येच कोरोना रुग्णांचे निदान करण्यात सक्षम आहोत. त्यामुळे आम्ही लवकर उपचार सुरू करण्यात यशस्वी ठरतोय. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन लावायची गरज भासत नाही आहे, असे केरळमधील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मोहम्मद अशील यांनी सांगितले. 

आज इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवत असलेल्या केरळमध्ये गेल्यावर्षी ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानच केरळने योग्य ती पावले उचलली. जेव्हा देशात कोरोनाचे रुग्णा वाढू लागले तेव्हा डॉ. वेणुगोपाल यांनी सर्व बल्क प्लँट्स आणि मेडिकल ऑक्सिजन निर्मात्यांना पत्र लिहून उत्पादन वाढवण्याची सूचना केली. त्यामुळे हे संकट वाढण्याआधीच केरळमधील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतKeralaकेरळOxygen Cylinderऑक्सिजनMedicalवैद्यकीय