शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

जनता कर्फ्यूला 1 वर्ष पूर्ण; तेव्हा पंतप्रधानांच्या फक्त एका आवाहनावर थांबला होता संपूर्ण देश, काय म्हणाले होते मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 09:14 IST

"...आज देशातील नागरिकांकडून आणखी एका गोष्टीसाठी समर्थन मागत आहे, ते म्हणजे जनता कर्फ्यू… अर्थात जनतेसाठी… जनतेकडून स्वतःवर लावण्यात आलेला कर्फ्यू..."

"...आज देशातील नागरिकांकडून आणखी एका गोष्टीसाठी समर्थन मागत आहे, ते म्हणजे जनता कर्फ्यू… अर्थात जनतेसाठी… जनतेकडून स्वतःवर लावण्यात आलेला कर्फ्यू..."

वर्ष 2020च्या सुरुवातीलाच संपूर्ण जगात कोरोना महामारिने हाहाकार माजवायला सुरुवात केली होती. याच काळात भारतासह संपूर्ण जग कोरोनाचा सामना करण्याच्या तयारीला लागले होते. तेव्हा 19 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 135 कोटी देशवासीयांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर 24 तासांसाठी संपूर्ण देश थांबला होता. शहर असो की गाव आणि सोसायटी असो वा कार्यालये सर्व ठिकाणी केवळ शांतता होती. आज या 'जनता कर्फ्यू'ला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

गेल्या वर्षी 30 जानेवारीला भारतात पहिला कोरोनारुग्ण आढळला. तेव्हा, हा आजार नेमका कसा आहे आणि तो केव्हापर्यंत संपेल हे कुणालाही माहीत नव्हते. पाहता पाहता कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, तेव्हा केंद्र सरकारने कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून सर्वप्रथम 22 मार्च 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले.

या जनता कर्फ्यूमध्ये 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येकाला आपल्या घरातच राहायचे होते. यावेळी सर्व बाजार, दुकान, सर्वजनिक वाहन, कार्यालये आणि शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले होते. यात केवळ अत्यंत आवश्यक असलेल्या क्षेत्रांतील लोकांनाच कामावर जाण्याची सूट देण्यात आलेली होती. 

काय म्हणाले होते मोदी -22 मार्च 2020 रोजी रविवारी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. मात्र, मोदींनी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले होते. या वेळी मोदींनी कोरोनासंदर्भात माहिती देत 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

करण्यात आले होते खास आवाहन -मोदींनी जनता कर्फ्यूसह जनतेला आणखी एक आवाहन केले होते. 22 मार्चला सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी आपल्या घराच्या बालकनीत उभे राहून दिवा लावत टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे हे आवाहन होते. देशात कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स ना सॅल्यूट करणे, असा या मागचा होतू होता.

मोदींच्या या आवाहनाचा परिणाम संपूर्ण देशावर झाला होता. केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारखी मोठी शहरेच नाही, तर छोट्यातील छोटे गावही या जनता कर्फ्यूचा भाग झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी 24 मार्चला पुन्हा जनतेला संबोधित केले. जनता कर्फ्यूचे कोतुक केले. तसेच याच वेळी देशात 21 दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउनचीही घोषणा केली. म्हणजेच लोकांना पुढचे 21 दिवस आपल्या घरातच राहायचे होते. संपूर्ण देश बंद झाला होता.

आता पुन्हा येतोय कोरोना -देशात जनता कर्फ्यू लागला, तेव्हा कोरोनाचे एकूण 330 रुग्ण होते. तेव्हा हा वेगही मनात धडकी बसवणारा होता. आता एक वर्षांनंतर पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. आता पुन्हा एकाच दिवसात 40 हजारच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. अशात काही राज्यांतील शहरांतही लॉकडाउनचा निर्णय घेतला जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMarketबाजार