शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Omicron Positive झाल्यानंतर किती दिवसांचा Quarantine आवश्यक? नीती आयोगाच्या आरोग्य तज्ज्ञांनीच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:22 IST

केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे, भारतासाठी तिसऱ्या लाटेचा इशाराही धोक्याचा ठरू शकतो.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने, संपूर्ण जगाचेच टेन्शन वाढवले आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. मात्र प्रश्न असा आहे, की  परदेशातून याणाऱ्या कुण्या भारतीय अथवा परदेशी व्यक्तीस ओमिक्रोनचा संसर्ग आढळून आल्यास, येथील आयसोलेशन अथवा क्वारंटाइनचा जो प्रोटोकॉल आहे तो कशा प्रकारचा आहे आणि तो डेल्टा व्हायरस सारखाच असेल की काहीसा वेगळा असेल?

यासंदर्भात बोलताना NITI आयोगाचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे, की जर एखाद्याने ओमायक्रॉनची चाचणी केली असेल, तर त्याने रिपोर्ट येईपर्यंत होम क्वारंटाईनमध्येच रहावे. तसेच, एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर त्याने 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच लोकांमध्ये जावे.

भारतात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमध्ये तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जाते. अशा वेळी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा धोका वाढवू शकतो. केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे, भारतासाठी तिसऱ्या लाटेचा इशाराही धोक्याचा ठरू शकतो.

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,525 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (2 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,81,770 वर पोहोचला आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस