शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Corona virus : सरकारचा 'तो' निर्णय असंवेदनशील, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाठिशी राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:45 IST

केंद्र सरकारच्या सर्व कर्मचारी आणि पेन्शन लाभार्थींना सद्यस्थितीतील वेतनानुसार पगार मिळेल. पण, पुढील दीड वर्षापर्यंत महागाई भत्त्यामध्ये कुठलीही वाढ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत लढणाऱ्या कर्माचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करणे, हा असंवेदनशील निर्णय असल्याचेही राहुल यांनी म्हटलंय. 

मुंबई - केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारात जुलै २०२१ पर्यंत कुठलीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. १ जानेवारी २०२० ते जुलै २०२१ पर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेतनात वाढ मिळणार नाही. म्हणजेच, जवळपास दीड वर्षे या सरकारी लाभधारकांना अधिकचा भत्ता आणि पैसे मिळणार नाहीत. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही केंद्राचा हा नियम लागू असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. तसेच, कोरोनाच्या लढाईत लढणाऱ्या कर्माचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करणे, हा असंवेदनशील निर्णय असल्याचेही राहुल यांनी म्हटलंय. 

केंद्र सरकारच्या सर्व कर्मचारी आणि पेन्शन लाभार्थींना सद्यस्थितीतील वेतनानुसार पगार मिळेल. पण, पुढील दीड वर्षापर्यंत महागाई भत्त्यामध्ये कुठलीही वाढ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू असून ३ मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे. अगदी कामगार, मजूरांपासून ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच, कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यासाठी, पीएम केअर फंडात निधी देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. शासन स्तरावरही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच सरकार परिस्थितीनुरूप निर्णय घेत आहे. त्यातून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात कुठलीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यास विरोध केलाय. 

राहुल यांनी आपल्या ट्विटवरुन मोदी सरकारच्या या निर्णयाला असंवेदनशील असे म्हटलंय. लाखो कोटींची बुलेटट्रेन योजना आणि केंद्रीय विस्टा सौंदर्यीकरण योजना बंद करायला हवी होती. मात्र, सरकारने, कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या, जनतेची सेवा करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या, पेन्शनधारकांच्या आणि जवानांच्या महागाई भत्त्यात कपात केली आहे. या सर्वांचा महागाई भत्ता कपात करणे हा असंवेदनशील निर्णय आहे, असे म्हणत राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. 

दरम्यान, केंद्र सराकरकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वर्षातून दोनवेळेस महामाई भत्ता वाढ होऊन मिळतो. बाजारातील जीवनावश्यक किंमतीतील वाढ लक्षात घेऊन हा महाभाई भत्ता देण्यात येतो. मात्र, सध्या देशात कोरोनामुळे जी आर्थिक स्थिती उद्भवली आहे, हे लक्षात घेऊन पुढील १.५ वर्षांपर्यंत महाभाई भत्त्याच्या रुपाने होणारी कुठलिही पगारवाढ मिळणार नाही. दरम्यान, जुलै २०२१ पासून पुढे हा महाभाई भत्ता सुरु केल्यानंतर, यापूर्वीचा कुठलाही फरक (एरिअर्स) मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकारBullet Trainबुलेट ट्रेन