शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

"फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:03 IST

युरोपसह अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा लाट आली असून, तेथे लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे.

एस.के. गुप्ता 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा उच्चस्तर ओलांडला असून, फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येईल, असा दावा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले की, लसीशिवाय कोरोना संपुष्टात येणे शक्य नाही.

युरोपसह अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा लाट आली असून, तेथे लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. आयआयटी आणि आयआयएसीच्या शास्त्रज्ञांनी गणितीय सूत्राच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार कोरोना फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात येण्याचे आकलन केले आहे. सोबतच त्यांनी शारीरिक अंतर राखणे आणि मास्क घालणे जरूरी असल्याचेही आवर्जून सांगितले.

राजेश भूषण यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांच्या समितीने केलेले अभ्यासपूर्ण आकलन आरोग्य मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे; परंतु तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनीही खबरदारी घेणे जरूरी असल्याचेही स्पष्ट केले आहे. ज्या गतीने कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, त्यानुसार या गणितीय सूत्रानुसार उपरोक्त समितीने आकलन केले असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य मंत्रालयही सातत्याने लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन करीत आहे.

मास्क हा एकमेव पर्यायकोरोनावरील लस येईपर्यंत आणि सर्वांचे लसीकरण होईपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, सातत्याने २० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुणे हाच एकमेव पर्याय आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीयmedicineऔषधंdoctorडॉक्टर