शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

Corona Virus: चीनहून आलेल्या 640 जणांना कोरोनाची लागण नाही; भारताला असलेला धोका आता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 06:30 IST

चीनच्या वुहानमध्ये व अन्य प्रांतांत कोरोना लागण होऊ न शेकडो लोक मरण पावले आहेत आणि २५ ते ३0 हजार लोकांना संसर्ग झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर तेथून विशेष विमानाने दिल्लीत आणलेल्या ६४0 पैकी एकाही भारतीयालाकोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे त्या विषाणूचा भारताला धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या सर्वांना आणखी काही दिवस एकांतवासामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय होईल.

चीनच्या वुहानमध्ये व अन्य प्रांतांत कोरोना लागण होऊ न शेकडो लोक मरण पावले आहेत आणि २५ ते ३0 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. त्या विषाणुमुळे अनेक लोक मरण पावत असल्याने भारताने गेल्या आठवड्यात एअर इंडियाची विमाने पाठवून तेथून ६४0 भारतीयांना परत आणले. त्यात बहुतांशी विद्यार्थी आहेत.

दिल्लीत आणल्यानंतर त्यांना दिल्लीत व काहींना हरयाणामध्ये एकांतवासात ठेवले आहे. त्यांच्यापैकी कोणाला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याचा संसर्ग बाहेरील लोकांना होऊ नये, असा त्याचा हेतू होता. तसेच त्यांच्या विविध चाचण्याही घेण्यात यायच्या होत्या. त्या सर्वांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, ६४0 पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यापासून आता कोणाला धोका नाही. त्यांच्यापैकी काहींनी पुन्हा चीनला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मात्र त्यांना किमान दोन महिने चीनला पाठवले जाणार नाही.केरळमध्ये मात्र तीन कोरोनाचे रुग्ण आहेत. तसेच तिथे कित्येक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ते तिघेही विद्यार्थी आहेत. दिल्ली व हरयाणामध्ये दूर ठेवलेल्यांमध्ये अनेक मराठी विद्यार्थीही आहेत.

भारतीय महिला हॉकी संघाचा चीन दौरा रद्द

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे भारतीय महिला हॉकी संघाला प्रस्तावित चीन दौरा रद्द करावा लागला आहे. यामुळे हॉकी इंडियापुढे ऑलिम्पिकच्या तयारीचे कठीण आव्हान उभे झाले. भारतीय संघाला १४ ते २५ मार्च या काळात चीनला जायचे होते. मात्र दौरा करावा लागला. भारताची कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, हा दौरा महत्त्वपूर्ण होता. प्रो हॉकी लीगमुळे दौऱ्यासाठी अन्य देश उपलब्ध नाहीत. तयारीसाठी बलाढ्य संघांविरुद्ध खेळणे आवश्यक असल्याने पर्यायाचा शोध सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतchinaचीन