शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Corona virus : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 22:11 IST

Corona virus : केंद्र सरकारने कोरोना महमारीशी लढ देत असलेल्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने कोरोना महमारीशी लढ देत असलेल्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्यात येणार आहे

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिविर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. त्यानंतर, आता केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य देत सर्वाधिक ऑक्सिजन देऊ केले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली.  

केंद्र सरकारने कोरोना महमारीशी लढ देत असलेल्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला आहे. उत्तरप्रदेश 800 मेट्रिक टन तर राजधानी दिल्लीला 350 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन देण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारने 12 राज्यांशी कोरोना परिस्थितीवर बैठक घेतल्यानंतर विविध अत्यावश्यक असलेलं साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये, 6,177 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे.  ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेने करण्याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रकाशित केले होते. त्यानंतर, आता ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात स्वत: रेल्वेमंत्र्यांनीच माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कालच देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील माहिती देताना टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.  रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधि व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. कोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली का, याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील १,१०० पैकी ५०० नमुन्यांची तपासणी झाली असून, सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून लवकरच दिला जाणार आहे. सर्वांत जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpiyush goyalपीयुष गोयलChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र