शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

Corona Vaccine: ‘आधार’अभावी लस, इतर सेवा नाकारता येणार नाही; इतर पर्यायांचा वापर शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 08:25 IST

‘यूआयडीएआय’ने केले स्पष्ट; आधारकार्ड नसल्यास किंवा काही कारणास्ताव त्याची ऑनलाइन पडताळणी होत नसली तरीही सेवा नाकारता येणार नाही. याबाबत आधार कायद्यात मार्गदर्शक सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून लस, औषधे, रुग्णालयात दाखल करून घेणे तसेच उपचारांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय)ने स्पष्ट केले आहे. 

“यूआयडीएआय”तर्फे सांगण्यात आले की, कोणतीही सेवा नाकारण्यासाठी ‘आधार’ नसल्याचे कारण देता येणार नाही. कोणाकडे आधारकार्ड नसल्यास कोणत्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो, हे सातत्याने सपष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणालाही लस, औषधे, उपचार तसेच रुग्णालयात दाखल होण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. आधार कार्ड नसल्याने अनेक कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासारख्या सेवांपासून वंचित ठेवले जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे प्राधिकरणाने आधारकार्ड कायद्यातील तरतुदींचा दाखला दिला आहे. आधारकार्ड नसल्यास किंवा काही कारणास्ताव त्याची ऑनलाइन पडताळणी होत नसली तरीही सेवा नाकारता येणार नाही. याबाबत आधार कायद्यात मार्गदर्शक सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 

‘आधार’ला काही अपवाद सार्वजनिक सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘आधार’ उपयुक्त आहे. मात्र, त्यास काही अपवाद असून ‘आधार’ नसल्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याला सेवा किंवा लाभ नाकारता येणार नाही. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करावी.

लस निर्यातीचे केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात समर्थनकोरोना महामारीचा सामना करताना संपूर्ण जग एक असल्याचे सांगून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लस निर्यातीचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले आहे. उत्पादनाचा विचार करुनच प्राथमिकता ठरवून लसीकरणाचा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात मार्च महिन्यात शपथपत्र दाखल केले होते. त्यात केंद्राने म्हटले आहे, की एखादी साथ जेव्हा जागतिक महामारीचे स्वरुप घेते तेव्हा त्याचा सामना संपूर्ण जग एक असल्याप्रमाणे करावा लागतो. जागतिक लसीकरणाला प्रतिसाद म्हणून सरकारने लसींची निर्यात केली. इतर देशातील संसर्गाचा धोका असलेल्या नागरिकांना संरक्षण देणे आवश्यक होते. 

...गोंधळ उडाला असता

याशिवाय सरकारने आणखी एक तर्क दिला आहे. सरकारने म्हटले आहे, की निर्यात मर्यादित होती. तसेच देशांतर्गत गरजेचा विचार करण्यात आला होता.  देशातील लस उत्पादन आणि उपलब्ध आरोग्य सुविधांमध्ये असामनता होऊ नये यासाठी प्राथमिकता ठरवून लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अन्यथा गोंधळ उडाला असता.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डCorona vaccineकोरोनाची लस