शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र; जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम
2
IND vs IRE : रोहितने विजयासह मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम; हिटमॅनला आता तोड नाही
3
Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, बैठकीनंतर दिले संकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही
4
Lok Sabha Election Result 2024 : जागा १२ च तरी केंद्रात किंगमेकर, नितीशकुमार यांची राहणार मोठी भूमिका, ‘जदयू’ला मिळू शकते झुकते माप 
5
"निकालाची जबाबदारी माझी; सरकारमधून मला मुक्त करा", उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे देवेंद्र फडणवीसांचे संकेत
6
‘इंडिया’कडून ऑफर नाही; एनडीएसोबतच राहणार : चिराग पासवान
7
Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशात भाजपच्या मित्रपक्षांना मोठा झटका, ६० पेक्षा अधिक लहान पक्षांनी खाल्ला मार
8
देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही
9
देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!
10
"अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही"; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर 
11
तबेल्यात दफन लेकीचा मृतदेह, वडिलांना माहिती असूनही गप्प; १ महिन्यानं उलगडलं रहस्य
12
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 
13
मोदी कोणाची साथ घेतायत? नायडूंनीच २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला, नितीशकुमारांचा वाद तर एवढे की...
14
केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
15
मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?
16
निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
17
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
18
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
19
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
20
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या

Corona Vaccine : 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 5:14 PM

Corona Vaccine : वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर चार महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. 

मध्य प्रदेशच्या बैतूलमधून एक अजब घटना समोर आली आहे. 4 महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे, परंतु अलीकडेच तिच्या कुटुंबीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसबद्दल मेसेज पाठवण्यात आला आहे. यानंतर आता 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?' असा प्रश्न कुटुंबीय उपस्थित करत आहेत. आजीला लस देण्यासाठी स्वर्गात कोण गेले? असं विचारत आरोग्य विभाग फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. बैतूल जिल्ह्यातील खंडारा या गावात ही घटना घडली आहे. शकुंतला यांचा ब्रेन हॅमरेजमुळे 1 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.

20 डिसेंबर रोजी आरोग्य विभागाकडून शकुंतला यांना कोरोनाचा दुसरा डोस मिळाला आहे आणि आता पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे असा मेसेज आला. यावर महिलेचा नातू रितेश राठोड याने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या आजीला स्वर्गात लस मिळाली की ती लस घेण्यासाठी पृथ्वीवर आली? असं विचारलं आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तरुणांनी केली आहे. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक मृत व्यक्ती किंवा इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांनाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याचे मेसेज आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 3,071 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (8 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,41,986 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,83,463 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,72,169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,44,12,740 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस