शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Corona Vaccine: लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारीनंतर केंद्राकडून डेटा जारी; पाहा कोणत्या राज्यात किती लसीचे डोस शिल्लक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:51 IST

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लस मोफत उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देसध्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे १ कोटींहून अधिक लसीचे डोस उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात २८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत.राजस्थानात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० लस उपलब्ध केल्यात. आता त्यांच्याकडे ३ लाख ९२ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली – देशात १ मे पासून १८ वर्षावरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. मात्र लसीची तुटवडा कमी असल्याने अनेक राज्यात लसीकरण होणार नसल्याचं सांगितलं जातं आहे. महाराष्ट्रातही १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण होणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड १९ चा १ कोटींहून अधिक लस उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.

त्याचसोबत पुढील ३ दिवसात राज्यांना ५७ लाख ७० हजार लसीचे डोस उपलब्ध केले जातील. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लस मोफत उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रालयाने याबाबतचा डेटा जारी केला आहे. त्यात सध्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे १ कोटींहून अधिक लसीचे डोस उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. अलीकडेच महाराष्ट्रात लसींचा साठी अपुरा असल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहे. त्यावरदेखील केंद्रीय मंत्रालयाने भाष्य केले आहे. महाराष्ट्रात २८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ०.२२ टक्के खराब झालेल्या डोससह १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ लसीचे डोस दिले गेले आहेत. आताही राज्याकडे ५ लाखाहून अधिक डोस शिल्लक आहेत. पुढील ३ दिवसांत महाराष्ट्राला ५ लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील असं केंद्राने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी ४ बिगर भाजपा शासित राज्यांनी १ मेपासून लसीकरण करण्यासाठी तयार नसल्याचं सांगितलं होतं. लसींचा अभाव असल्याने लसीकरण कसं करायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने हा डेटा जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीला ३६ लाख ९० हजार लसीचे डोस दिले आहेत. त्यातील ३२ लाख ४३ हजार ३०० लसीच डोस संपलेत. आताही राज्याकडे ४ लाख ४७ हजार ४१० लसीचे डोस शिल्लक आहेत. आणि यापुढे दिड लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील.

राजस्थानात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० लस उपलब्ध केल्यात. आता त्यांच्याकडे ३ लाख ९२ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यांना २ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये १ कोटी ९ लाख ८३ हजार ३४० डोस दिलेत. त्यातील २ लाख ९२ हजार ८०८ डोस शिल्लक आहेत. तर ४ लाख आणखी डोस उपलब्ध करणार आहोत. छत्तीसगडमध्ये ५९ लाख १६ हजार ५५० लसीचे डोस दिलेत. त्यातील ३ लाख ३८ हजार ९६३ डोस शिल्लक आहेत. त्यांनाही २ लाख लसीचे डोस लवकरच दिले जातील असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस