शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 09:35 IST

Corona Vaccination for All Updates: देशातील कोरोनाची सध्या आकडेवारी पाहता या काळात सर्वांसाठी कोरोना लसीकरण करण्यावर विचार करायला हवा. हा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरणाचा अहवाल दिलाअहवालात असे म्हटले आहे की, जे कोरोनातून बरे झाले आहेत त्यांना लस देण्याची गरज नाहीमोठ्या प्रमाणावर लसीकरणापेक्षा जास्त जोखीम असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करा

नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असताना केंद्र सरकारनं लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण केले जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता तज्ज्ञांनी पंतप्रधानांना एक रिपोर्ट सुपूर्द केला आहे. जे लोक कोरोनातून बरे झालेत त्यांना लसीची आवश्यकता नाही अशी शिफारस तज्त्रांनी पंतप्रधानांना अहवालातून केली आहे.

या तज्त्रांनी सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम आखणण्याऐवजी ज्यांना लोकांना अधिक धोका आहे अशांचं लसीकरण केलं जावं. मोठ्या प्रमाणात लसीकरण हे अपूर्ण होऊ शकतं त्यामुळे व्हायरस म्यूटेंट आणखी जास्त पसरू शकतं असं तज्त्रांना वाटतं. या तज्ज्ञांच्या समितीत एम्सचे डॉक्टर्स आणि कोविड १९ संदर्भातील टास्कफोर्समधील सदस्यही आहेत. या समुहाने अलीकडेच हा रिपोर्ट दिला त्यात सांगितलं की, मोठ्या संख्येने लसीकरण करण्यापेक्षा संवेदनशील आणि अतिजोखीम असलेल्या लोकांना कोरोनाची लस द्यावी.

तसेच ज्या जागी डेल्टा वेरिएंटमुळे वेगाने संक्रमण वाढत आहे. अशाठिकाणी कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर कमी करण्यात यावं. आता कोविशील्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमीत कमी १२ आठवडे ठेवण्यात आलं आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमॉलिजिस्टस आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीवेंटिव एँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट बनवला आहे. त्यात म्हटलंय की, देशातील कोरोनाची सध्या आकडेवारी पाहता या काळात सर्वांसाठी कोरोना लसीकरण करण्यावर विचार करायला हवा. हा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे.

सर्व वयोगटातील लोक आणि मुलांचे लसीकरण करणं योग्य राहणार नाही आणि ते परवडणारं नाही. अनियोजित लसीकरणामुळे म्यूटेंट वेरिएंटस वाढू शकतो. त्यामुळे जे लोक कोरोनातून बरे झालेत त्यांचे लसीकरण करण्याची आता काही आवश्यकता नाही. सर्वांना लस देण्यानं काही साध्य होणार नाही. विशेष म्हणजे महामारीच्या संकटात लसीची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी ज्या लोकांना धोका आहे अशा लोकांचे लसीकरण करायला हवं असं रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी