शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:22 IST

Corona Vaccination: एकही डोस वाया न घालवण्याचा केरळने केला विक्रम

शिक्षण आणि आरोग्य या दोन अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रांत केरळ राज्य नेहमीच देशात अग्रेसर राहिले आहे. कोरोनाकहरातही केरळने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तम कामगिरी बजावली आहे. जेव्हा देशभरातील राज्ये या ना त्या कारणाने लसमात्रा वाया घालवत होते तेव्हा केरळने एकही लसमात्रा वाया न घालवण्याचा विक्रम नोंदवला.हे कसे शक्य झाले?लसींच्या वापराचे सुनियोजित व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन या दोन सूत्रांमुळे हे शक्य झाले.उदाहरणार्थ, एखाद्या लसीकरण केंदरात १०० लोकांचे लसीकरण करायचे असेल तर त्यातून ज्यांना दुसरा डोस द्यायचा आहे, अशा ७०-८० लोकांची निवड करायची आणि उर्वरितांना पहिला डोस द्यायचा.डोस देताना प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने लसी वाया जाण्याचे प्रमाण शून्य राहिले.वेळेचे नियोजनआवश्यक तेवढ्याच डोसचा वापर केरळात केला जातो.लसीची कोणतीही कुपी उघडल्यानंतर चार तासांत ती १० जणांना द्यावी लागते.चार तासांनंतरही कुपी उघडीच राहिली तर त्यातील लस वाया जाते.त्यामुळे लसीकरण केंद्रात १० जण आल्यानंतरच आरोग्य कर्मचारी लसकुपी उघडतात.असे केल्याने उद्दिष्ट साध्य होते आणि लस वायाही जात नाही.लसीकरणाचे केरळ मॉडेल असे...कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्या ५एमएलच्या एका कुपीत लसीचे १० डोस असतात.म्हणजेच एका कुपीद्वारे १० जणांचे लसीकरण केले जाऊ शकते.कुपीतील लस कमी होऊ नये यासाठी लसनिर्मात्या कंपन्या कुप्यांमध्ये अतिरिक्त डोसही टाकतात.त्यामुळे अतिरिक्त दोघांना डोस देता येऊ शकतात.केरळमधील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी प्रशिक्षित असल्याने अतिरिक्त डोस तयार करून ते अधिकाधिक लोकांचे लसीकरण करत आहेत.लसीचा एकही डोस वाया न घालवणाऱ्या या केरळ प्रारूपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे.केरळला आतापर्यंत ७३,३८,८०६ लसींचा पुरवठा झाला आहे.त्यातून केरळने ७४,२६,१६४ मात्रा लोकांना दिल्यायाचा अर्थ केरळने ८७,३५८ अतिरिक्त लसीकरण केले१ टक्के सुद्धा केरळने लसमात्रा वाया घालवल्या नाहीत

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस