शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Corona Vaccination: कोरोनाचा कहर! आता सुट्टीच्या दिवशीही लस मिळणार; केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:58 IST

coronavirus vaccination: केंद्र सरकारकडून याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवातकोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भरकोरोना लसीकरणासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा देशभरात सुरू झाला असून, ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी केली जात असताना केंद्र सरकारकडून याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (coronavirus update now vaccination to be done on all days)

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात वेग वाढावा, यासाठी एप्रिल महिन्यातील सर्व दिवशी लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत. सार्वजनिक सुट्टींच्या दिवशीही कोरोना लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. 

सुट्टीच्या दिवशीही लस दिली जाणार

एप्रिल महिन्याच्या कालावधीत कोरोना लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुट्टीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”

कोरोना संक्रमणाचा वेग चढाच

महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्राने काही निर्णयही घेतले आहेत. त्यात कोरोना लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या जिल्ह्यांत दोन आठवड्यात कोरोना लसीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२,३३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,२२,२१,६६५ वर पोहोचली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,६२,९२७ पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ५,८४,०५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १,१४,७४,६८३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार