शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Corona: रुग्णसंख्या वाढतेय, कोरोनामुळे पुन्हा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणार? मास्क वापरावा लागणार? तज्ज्ञ म्हणतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 00:13 IST

Corona Virus: देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. देशामध्ये १८ हजारांच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. देशामध्ये १८ हजारांच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. येथे दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून महाराष्ट्रामध्ये रुग्णालयात मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावेळचा कोरोनाच्या व्हेरिएंट थोडा वेगळा आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट तर येणार नाही ना? पुन्हा एकदा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण तर होणार नाही ना? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. 

दिल्लीतील एम्सचे माजी संचालक महेशचंद्र मिश्र यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांची संख्या वाढणंही शक्यही आहे. कोरोना विषाणूबाबत बऱ्याच काळापासून तो संपुष्टात आलेला नाही, असं सांगितलं जातंय. तो आपल्या आसपासच आहे. कारण  व्हायरस हा वारंवार म्युटेट होत राहतो, जिवंत राहण्यासाठी आपलं स्वरूप बदलत राहतो. तसेच कोरोना व्हायरस करत आहे. या म्युटेशनमधून कधीकधी एखादा व्हायरस धोकादायक बनतो. तर अनेकदा हा व्हायरस फार प्रभावित न करता निघून जातो. 

पुन्हा एकदा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणार का, असं विचारलं असता, डॉ. मिश्रा म्हणाले की, कोरोनापासून धोका आहे का, ह प्रश्न असेल तर कोरोना आता लोकांना आजारी पाडत राहील, हे समजून घ्या. तो व्हायरल आणि फ्लू प्रमाणे लोकांना संक्रमित करत राहील. मात्र ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता २०२० किंवा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणे शक्य नाही. त्यावेळी दोन गोष्टी नव्हत्या. पहिली म्हणजे कोरोनावरील लस आणि संसर्गापासून बनलेली इम्युनिटी. त्यामुळे त्यावेळी कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. मात्र आताच्या काळाबाबत बोलायचं झाल्यास कोरोनाच्या साथीचा तो काळ परत येण्याची शक्यता नाही आहे.

डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, कोरोनापासून रक्षण करण्यासाठी आज लोकांच्या शरीरामध्ये व्हॅक्सिनपासून बनलेली इम्युनिटी आणि संसर्गापासून बनलेली इम्युनिटी अशा दोन्हीही आहेत. अशा परिस्थितीत कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होईल, असं वाटत नाही. असं असलं तरी कोरोना बाधित करू शकतो. त्याच्यापासून बचावासाठी मास्क वापरणं अनिवार्य करण्याचा आदेश किंवा दंडाची घोषणा करणे आवश्यक नाही. लोकांनीच तो अनिवार्य समजून वापरला पाहिजे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत