शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Corona: रुग्णसंख्या वाढतेय, कोरोनामुळे पुन्हा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणार? मास्क वापरावा लागणार? तज्ज्ञ म्हणतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 00:13 IST

Corona Virus: देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. देशामध्ये १८ हजारांच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. देशामध्ये १८ हजारांच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. येथे दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून महाराष्ट्रामध्ये रुग्णालयात मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावेळचा कोरोनाच्या व्हेरिएंट थोडा वेगळा आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट तर येणार नाही ना? पुन्हा एकदा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण तर होणार नाही ना? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. 

दिल्लीतील एम्सचे माजी संचालक महेशचंद्र मिश्र यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांची संख्या वाढणंही शक्यही आहे. कोरोना विषाणूबाबत बऱ्याच काळापासून तो संपुष्टात आलेला नाही, असं सांगितलं जातंय. तो आपल्या आसपासच आहे. कारण  व्हायरस हा वारंवार म्युटेट होत राहतो, जिवंत राहण्यासाठी आपलं स्वरूप बदलत राहतो. तसेच कोरोना व्हायरस करत आहे. या म्युटेशनमधून कधीकधी एखादा व्हायरस धोकादायक बनतो. तर अनेकदा हा व्हायरस फार प्रभावित न करता निघून जातो. 

पुन्हा एकदा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणार का, असं विचारलं असता, डॉ. मिश्रा म्हणाले की, कोरोनापासून धोका आहे का, ह प्रश्न असेल तर कोरोना आता लोकांना आजारी पाडत राहील, हे समजून घ्या. तो व्हायरल आणि फ्लू प्रमाणे लोकांना संक्रमित करत राहील. मात्र ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता २०२० किंवा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणे शक्य नाही. त्यावेळी दोन गोष्टी नव्हत्या. पहिली म्हणजे कोरोनावरील लस आणि संसर्गापासून बनलेली इम्युनिटी. त्यामुळे त्यावेळी कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. मात्र आताच्या काळाबाबत बोलायचं झाल्यास कोरोनाच्या साथीचा तो काळ परत येण्याची शक्यता नाही आहे.

डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, कोरोनापासून रक्षण करण्यासाठी आज लोकांच्या शरीरामध्ये व्हॅक्सिनपासून बनलेली इम्युनिटी आणि संसर्गापासून बनलेली इम्युनिटी अशा दोन्हीही आहेत. अशा परिस्थितीत कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होईल, असं वाटत नाही. असं असलं तरी कोरोना बाधित करू शकतो. त्याच्यापासून बचावासाठी मास्क वापरणं अनिवार्य करण्याचा आदेश किंवा दंडाची घोषणा करणे आवश्यक नाही. लोकांनीच तो अनिवार्य समजून वापरला पाहिजे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत