शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: कोरोना काळात मुलीचं लग्न बनलं वडिलांच्या मृत्यूचं कारण; दंडाची रक्कम पाहून शेतकरी पित्याने प्राण सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:14 IST

या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देअडीला गावात एका लग्न समारंभात कोविड १९ नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी असलेल्या वधू पित्याला जमीन गहाण ठेऊन रक्कम भरावी लागलीपतीची तब्येत बिघडली त्यांच्या उपचारासाठीही आमच्याकडे पैसे शिल्लक नव्हते.

जयपूर – राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात कोरोना काळात लग्नावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. यातील निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने एका वधुपित्यावर दंड आकारण्यात आला. त्यामुळे या कारवाईचा धसका घेऊन वधूच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाकडून दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्याची जमीन गहान ठेवावी लागली आणि पैसे जमा करावे लागले. मात्र ३ दिवसानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार, कापरेन नगरपालिकेच्या परिसरात येणाऱ्या अडीला गावात एका लग्न समारंभात कोविड १९ नियमांचे उल्लंघन झालं. त्यामुळे प्रशासनाकडून वधू पित्याला १ लाखांचा दंड ठोठावला. त्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी असलेल्या वधू पित्याला जमीन गहाण ठेऊन रक्कम भरावी लागली. मात्र या कारवाईचा धसका घेतल्याने त्यांचा २० मे रोजी मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली  

मृतकाच्या पत्नी आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मृतकाची पत्नी बृजमोहन मीणा म्हणाल्या की, १४ मे २०२१ रोजी माझ्या लहान मुलीचं लग्न कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होत होतं. त्यात कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करण्यात आलं. सर्व व्यक्ती मास्क आणि सोशल डिस्टेसिंगचं पालन करत होते. त्यासह लग्न समारंभात मर्यादित संख्या होती असं त्यांचे म्हणणं आहे.

त्याचवेळी कुटुंबातील ७ लोक जेवण करत होते. तेव्हा काही अधिकारी आमच्या घरी पोहचले. तेव्हा त्यांच्या येण्याने गावकरीही जमले. या गर्दीचा व्हिडीओ बनवून अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि त्याचसोबत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. माझ्या पतीची तब्येत आधीच खराब होती. त्यात या प्रकारामुळे तब्येत आणखी बिघडली. प्रशासनाकडून दंड भरण्यासाठी दबाव येत होता. आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशावेळी जमीन गहाण ठेऊन आम्ही दंडाची रक्कम भरली होती असं पत्नी म्हणाली.

त्यानंतर पतीची तब्येत बिघडली त्यांच्या उपचारासाठीही आमच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. त्यात २० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीमुळे आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंबाने निवेदनात केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या