शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

CoronaVirus News: कोरोनाच्या संसर्गाचा आर्थिक वृद्धीला धोका; वित्त मंत्रालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 04:27 IST

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर लॉकडाऊन लागू केल्यामुळे एप्रिल-जूनचा वृद्धिदर २३.९ टक्क्यांनी घसरला होता.

नवी दिल्ली : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणेने गती पकडली आहे. तथापि, कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसारही सातत्याने होत असल्यामुळे आर्थिक वृद्धीला धोका आहे, असे वित्त मंत्रालयाने सप्टेंबरसाठी जारी केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे.यासंबंधीच्या अहवालात म्हटले आहे की, भारतात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू आहे. दिवसागणिक नवनवी क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसून येत आहे. काही क्षेत्रांतील वाढ तर मागील वर्षापेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे. बिगर-मेट्रो शहरे आणि ग्रामीण भागात कोरोची वाढती साथ आणि वस्तूंच्या वाढत्या किमती असे अडथळे असतानाही ही वाढ दिसून येत आहे.कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर लॉकडाऊन लागू केल्यामुळे एप्रिल-जूनचा वृद्धिदर २३.९ टक्क्यांनी घसरला होता. आॅगस्टच्या मासिक आढाव्यात वित्त मंत्रालयाने ही माहिती जारी केली होती. साथीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने अनेक धोरणात्मक उपाय योजले आहेत. अनेक संरचनात्मक सुधारणा हाती घेतल्या आहेत. अर्थव्यवस्थेचे मूलभूत आधार त्यामुळे मजबूत होतील. मजबूत आणि शाश्वत दीर्घकालीन वृद्धीसाठी त्याचा फायदा होईल.सूत्रांनी सांगितले की, १७ ते ३0 सप्टेंबर या काळातील आकडेवारी-नुसार, भारताने कोरोनाचा सर्वोच्च बाधाकाळ ओलांडला असावा, असे मानले जात आहे.मध्यमकालीन वृद्धीदराला धोका कायमसप्टेंबरच्या आढाव्यात वित्त मंत्रालयाने म्हटले की, कोरोना साथीच्या सर्वोच्च बाधाकाळाचा टप्पा भारताने ओलांडला असावा, असे बोलले जात आहे. तथापि, कोरोना साथ अजूनही पसरत आहे. अल्पकालीन आणि मध्यमकालीन वृद्धीदराला असलेला धोका कायम आहे.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्या