शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? गेल्या चोवीस तासात देशात 805 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 12:19 IST

कोरोनाची नवीन प्रकरणे कमी झाली आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. देशात दररोज 14 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पण, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीने भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात 805 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 14,348 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,42,46,157 झाली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,61,334 वर आहे.

एका दिवसात 805 लोकांचा मृत्यू झाला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना संसर्गामुळे देशभरात 805 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता एकूण मृतांची संख्या 4,57,191 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना रुग्णांची दैनंदिन प्रकरणे सलग 35 व्या दिवशी 30,000 पेक्षा कमी आहेत आणि सलग 124 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी आहेत.

साथीचा धोका कायम

आकडेवारीनुसार, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.47 टक्के आहे, जी मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.19 टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. त्याच वेळी, संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली होती. देशात 19 डिसेंबर रोजी ही प्रकरणे एक कोटीच्या पुढे गेली होती, तर यावर्षी 4 मे रोजी दोन कोटी आणि 23 जून रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतDeathमृत्यू