शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
3
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
4
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
5
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
6
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
7
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
8
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
9
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
10
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
11
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
12
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
13
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
14
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
15
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
16
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
17
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
18
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
19
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
20
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

कोरोना काळात व्यापाऱ्यांवर कोसळलं मोठं संकट; एका वर्षात 11,716 व्यापाऱ्यांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:11 IST

गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.

नवी दिल्ली - कोरोनाचा आरोग्यसह अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच 2019 च्यातुलनेत 2020 मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये तब्बल 11716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली. 2019च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 29% अधिक आहे. अर्थात 2020 म्हणजेच कोरोना काळात व्यापारी वर्गाने कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांपेक्षाही अधिक आर्थिक तणाव आणि संकटाचा सामना केला आहे.

गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.

शेतकऱ्यांहून अधिक व्यापाऱ्यांनी केली आत्महत्या -एनसीआरबीने आत्महत्या प्रकरणांची विभागणी केलेली नाही. मात्र, आत्महत्या करणारे बहुतांश व्यापारी एमएसएमई क्षेत्राशी संबंधित होते, असे म्हणता येणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2020 मध्ये 11,716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. तर याच काळात 10,677 शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या आहेत. 2015च्या आकडेवारीचा विचार करता, तेव्हा प्रत्येक एका व्यापाऱ्यामागे 1.44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. पण, 2020 मध्ये प्रत्येक एका शेतकऱ्यामागे 1.1 व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.

टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसद