शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना काळात व्यापाऱ्यांवर कोसळलं मोठं संकट; एका वर्षात 11,716 व्यापाऱ्यांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:11 IST

गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.

नवी दिल्ली - कोरोनाचा आरोग्यसह अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच 2019 च्यातुलनेत 2020 मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये तब्बल 11716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली. 2019च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 29% अधिक आहे. अर्थात 2020 म्हणजेच कोरोना काळात व्यापारी वर्गाने कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांपेक्षाही अधिक आर्थिक तणाव आणि संकटाचा सामना केला आहे.

गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.

शेतकऱ्यांहून अधिक व्यापाऱ्यांनी केली आत्महत्या -एनसीआरबीने आत्महत्या प्रकरणांची विभागणी केलेली नाही. मात्र, आत्महत्या करणारे बहुतांश व्यापारी एमएसएमई क्षेत्राशी संबंधित होते, असे म्हणता येणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2020 मध्ये 11,716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. तर याच काळात 10,677 शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या आहेत. 2015च्या आकडेवारीचा विचार करता, तेव्हा प्रत्येक एका व्यापाऱ्यामागे 1.44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. पण, 2020 मध्ये प्रत्येक एका शेतकऱ्यामागे 1.1 व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.

टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसद