शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

देशात कोरोनामुळे १ ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता, ‘लॅन्सेट’चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 03:07 IST

भारतामध्ये कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या शनिवारपर्यंत २ लाख ३८ हजार २७० होती. देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येत्या १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. जर अशी स्थिती ओढवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ते सर्वांत मोठे अपयश असेल, असेही या नियतकालिकाने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. (Corona is expected to kill one million people in the country by August 1, says Lancet)भारतामध्ये कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या शनिवारपर्यंत २ लाख ३८ हजार २७० होती. देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील घडामोडींवर संशोधन करणारी ही जागतिक दर्जाची स्वतंत्र संस्था आहे. तिने केलेल्या भाकिताचा हवाला देत लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, कोरोनावर प्रारंभीच्या काळात मिळविलेल्या यशाने भारताचा वारू उधळला होता. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कृती गटाची त्यामुळे एप्रिलपर्यंत बैठकच झाली नव्हती.

लॅन्सेटच्या संपादकीय म्हटले आहे की, कोरोना साथीची स्थिती हाताळताना आपल्या हातून झालेल्या चुका मोदी सरकारने मान्य करून आता अतिशय पारदर्शकपणे धोरणे राबविली पाहिजेत. हे धोरण द्विस्तरीय असावे. सध्याच्या भोंगळ पद्धतीने राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेतील सर्व त्रुटी भारताने दूर कराव्यात व या मोहिमेचा वेग वाढवावा. 

भूलथापा मारण्यात मश्गूल-    लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे वारंवार इशारे देण्यात येऊनही मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे असे कार्यक्रम, जाहीर सभांमध्ये लाखो लोक उपस्थित राहिले. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रचंड फैलावला.-    भारत सामूहिक प्रतिकारशक्तीच्या जवळ आला आहे असे काही जण सांगत होते; पण त्यात काही तथ्य नाही. आपल्यावर होत असलेल्या टीकेबाबत गंभीरपणे विचार करण्याऐवजी मोदी सरकार कोरोना साथ कशी नियंत्रणात आणली याच्या ट्विटरवरून भूलथापा मारण्यात मश्गूल होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतhospitalहॉस्पिटलOxygen Cylinderऑक्सिजन