शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

शेती उत्पादन दुप्पट होण्यासाठी सहकार क्षेत्राने नव्या पर्यायांचा शोध घ्यावा- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 15:07 IST

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या सहकार संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.

ठळक मुद्देलक्ष्मणराव इनामदार यांनी 'सहकार भारती' नावाने मुंबईत 1979 साली चळवळ सुरु केली होती. इनामदार आणि सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर 9 जणांवरती लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्यमंत्री कृष्णा राज आणि गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते.

नवी दिल्ली, दि.21-  2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि ग्रामिण अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी सहकार क्षेत्राने मधुमक्षिका पालन, सीविड फार्मिंग (समुद्री उपयुक्त पानांची शेती ) अशा नव्या पर्यायांकडे लक्ष द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. तसेच सहकाराचे बीज अधिक सक्षम आणि कायम जिवंत राहिले पाहिजे असेही विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'भारतामध्ये सहकार क्षेत्र वाढणं आणि त्याचा विकास होणं अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक क्षेत्रांमध्ये सहकार क्षेत्र कार्य करु शकतं आणि सकारात्मक बदल घडवू शकतं.'

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल याचा विचार या क्षेत्रातील लोकांनी करावा असे आवाहनही यांनी त्यांनी केले. ते म्हणाले, ' सध्या शेतकरी किरकोळ भावात खरेदी करतात आणि घाऊक पद्धतीत विकतात, ही प्रक्रीया उलट करता येऊ शकते का? जर ते घाऊक भावात (शेतीस आवश्यक गोष्टी) विकत घेऊ लागले आणि किरकोळ बावात विकू लागले तर त्यांना कोणीही लुटू शकणार नाही, इतकेच काय मध्यस्थही त्यांना लुटू शकणार नाहीत.''

दुग्धउत्पादनातील शेतकऱ्यांचा विकास झाला कारण त्यांनी दुधाची घाऊक भावात खरेदी-विक्री केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सहकार क्षेत्राने अशा प्रकारे काम करण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधानांनी मांडले. सहकार क्षेत्र साखर आणि दूध या दोन विभागांमध्ये सर्वाधिक काम करत असल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले, आता सहकाराने नव्या क्षेत्रांमधील शक्यतांचा शोध घ्यायला हवा. असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकेल अशी काही उदाहरणेही दिली. ''युरिया खतामध्ये नीम तेलाची गरज मोठी भासते, हे कडुनिंब गोळा करण्याचे काम महिला करु शकतात. दुसरे क्षेत्र आहे ते मधुमक्षिकापालनाचे. शेतकरी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून 'मधुक्रांती' घडवू शकतात. यातुन मिळणाऱ्या मधालाच केवळ बाजारात किंमत आहे असे नव्हे तर मेणालाही किंमत आहे'' असे मोदी म्हणाले. मासेमारी करणारे लोक हंगाम नसताना सी विड फार्मिंगचा आधार घेऊ शकतात. त्यातून मिळणारे उत्पादन औषध उद्योग आणि खतासाठी वापरले जाऊ शकते असेही ते म्हणाले. अशा प्रकारची लहानलहान पावले उत्पन्न वाढवण्यास उपयोगी पडतील.लक्ष्मणराव इनामदार यांनी 'सहकार भारती' नावाने मुंबईत 1979 साली चळवळ सुरु केली होती. इनामदार आणि सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर 9 जणांवरती लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्यमंत्री कृष्णा राज आणि गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते.

सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर

टॅग्स :Indiaभारत