शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शेती उत्पादन दुप्पट होण्यासाठी सहकार क्षेत्राने नव्या पर्यायांचा शोध घ्यावा- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 15:07 IST

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या सहकार संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.

ठळक मुद्देलक्ष्मणराव इनामदार यांनी 'सहकार भारती' नावाने मुंबईत 1979 साली चळवळ सुरु केली होती. इनामदार आणि सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर 9 जणांवरती लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्यमंत्री कृष्णा राज आणि गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते.

नवी दिल्ली, दि.21-  2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि ग्रामिण अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी सहकार क्षेत्राने मधुमक्षिका पालन, सीविड फार्मिंग (समुद्री उपयुक्त पानांची शेती ) अशा नव्या पर्यायांकडे लक्ष द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. तसेच सहकाराचे बीज अधिक सक्षम आणि कायम जिवंत राहिले पाहिजे असेही विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'भारतामध्ये सहकार क्षेत्र वाढणं आणि त्याचा विकास होणं अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक क्षेत्रांमध्ये सहकार क्षेत्र कार्य करु शकतं आणि सकारात्मक बदल घडवू शकतं.'

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल याचा विचार या क्षेत्रातील लोकांनी करावा असे आवाहनही यांनी त्यांनी केले. ते म्हणाले, ' सध्या शेतकरी किरकोळ भावात खरेदी करतात आणि घाऊक पद्धतीत विकतात, ही प्रक्रीया उलट करता येऊ शकते का? जर ते घाऊक भावात (शेतीस आवश्यक गोष्टी) विकत घेऊ लागले आणि किरकोळ बावात विकू लागले तर त्यांना कोणीही लुटू शकणार नाही, इतकेच काय मध्यस्थही त्यांना लुटू शकणार नाहीत.''

दुग्धउत्पादनातील शेतकऱ्यांचा विकास झाला कारण त्यांनी दुधाची घाऊक भावात खरेदी-विक्री केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सहकार क्षेत्राने अशा प्रकारे काम करण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधानांनी मांडले. सहकार क्षेत्र साखर आणि दूध या दोन विभागांमध्ये सर्वाधिक काम करत असल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले, आता सहकाराने नव्या क्षेत्रांमधील शक्यतांचा शोध घ्यायला हवा. असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकेल अशी काही उदाहरणेही दिली. ''युरिया खतामध्ये नीम तेलाची गरज मोठी भासते, हे कडुनिंब गोळा करण्याचे काम महिला करु शकतात. दुसरे क्षेत्र आहे ते मधुमक्षिकापालनाचे. शेतकरी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून 'मधुक्रांती' घडवू शकतात. यातुन मिळणाऱ्या मधालाच केवळ बाजारात किंमत आहे असे नव्हे तर मेणालाही किंमत आहे'' असे मोदी म्हणाले. मासेमारी करणारे लोक हंगाम नसताना सी विड फार्मिंगचा आधार घेऊ शकतात. त्यातून मिळणारे उत्पादन औषध उद्योग आणि खतासाठी वापरले जाऊ शकते असेही ते म्हणाले. अशा प्रकारची लहानलहान पावले उत्पन्न वाढवण्यास उपयोगी पडतील.लक्ष्मणराव इनामदार यांनी 'सहकार भारती' नावाने मुंबईत 1979 साली चळवळ सुरु केली होती. इनामदार आणि सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर 9 जणांवरती लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्यमंत्री कृष्णा राज आणि गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते.

सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर

टॅग्स :Indiaभारत