शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

योगी सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वादळ; ३ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 10:05 IST

काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपानं मंत्रिमंडळात घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमुळे जितीन प्रसाद चर्चेत आले आहेत

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात १०० दिवस पूर्ण होण्यासोबत राज्यात झालेल्या बदल्यांवरून खळबळ माजली आहे. योगी सरकारचे ३ मंत्री चर्चेत आले आहेत. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांच्या आरोग्य विभागात झालेल्या बदल्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यानंतर आता जितीन प्रसाद यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर पाणी पुरवठा विभागातल्या बदल्यांवरही तणाव असल्याचं बोलले जात आहे. 

जितीन प्रसाद यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ३५० हून अधिक अभियंत्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सुमारे २०० कार्यकारी अभियंता आणि १५० हून अधिक सहायक अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीएम योगी यांनी केवळ पीडब्ल्यूडी विभागातील बदल्यांची चौकशी केली नाही तर जितीन प्रसाद यांचे ओएसडी अनिल कुमार पांडे यांचीही चौकशी सुरू केली आहे. पांडे यांची सरकारने दक्षता चौकशी आणि विभागीय कारवाईची शिफारसही केली आहे.

काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपानं मंत्रिमंडळात घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमुळे जितीन प्रसाद चर्चेत आले आहेत. बदल्यांच्या चौकशीमुळे ते नाराज असल्याचं समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन ते नाराजी व्यक्त करणार आहेत. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आरोग्य विभागातील बदल्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. एका जिल्ह्यात असणाऱ्या पती-पत्नीला वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली करण्यात आलं आहे. या बदल्यांवर खुद्द मंत्री बृजेश पाठक यांनी प्रश्न उभे केले. 

तर राज्यमंत्री असून जलशक्ती मंत्रालयातील अधिकारी ऐकत नसल्याने मंत्री दिनेश खटीक नाराज आहेत. खटीक यांनी बदल्यांची यादी अधिकाऱ्यांकडे दिली होती. परंतु कॅबिनेट मंत्र्यांशी बोला असं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे नाराज झालेल्या दिनेश खटीक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असल्याची चर्चा आहे. परंतु सरकारने या बातमीचं खंडन केले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश