शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 23:48 IST

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रापंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूनंतर हल्का फिल्लौर येथील आमदार आणि संतोख सिंह यांचे पुत्र विक्रमजित चौधरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

आमदार विक्रमजित चौधरी म्हणाले की, रुग्णवाहिकेतून नेत असताना पंप केल्यावर माझे वडीस श्वास घेत होते. तेवढ्यात तिथे असलेल्या डॉक्टरांनी आम्हाला बाजूला होण्यास सांगितले. मात्र या डॉक्टरांकडे आणीबाणीच्या परिस्थितीत शॉक देण्यासाठी कुठलेही साहित्य नव्हते. तेथील डॉक्टर खूप गडबडीत होते. संतोख सिंह यांनी आयुष्यात केवळ डोळ्यांची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. एवढंच नाही तर विक्रमजित चौधरींसह विरोधी पक्षांनीही या घटनेसाठी आम आदमी पक्षाला दोषी ठरवले आहे.

या घटनेबाबत भाजपाचे नेते आणि माजी मंत्री  मनोरंजन कालिया यांनी सांगितले की, उपचारांमध्ये दिरंगाई झाली. त्यासाठी आम आदमी पक्ष जबाबदार आहे. संतोख सिंह यांना जर वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता आले असते. राहुल गांधी यांच्या मागे जी रुग्णवाहिका चालत होती तिच्यामध्ये पुरेशी व्यवस्थाच नव्हती. याची थेट जबाबदारी आम आदमी पक्षाची आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची आहे.

कालिया पुढे म्हणाले की, किमान व्हीआयपींसाठी तरी पुरेशी व्यवस्था असली पाहिजे होती. जिथे झोपायची जागा होती, तिथे सामान पडलेले होते. तसेच डॉक्टर गडबडीत एकमेकांकडे पाहत होते. हे डॉक्टर अशा आणीबाणीसाठी प्रशिक्षित नव्हते.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसPunjabपंजाब