शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 23:48 IST

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रापंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूनंतर हल्का फिल्लौर येथील आमदार आणि संतोख सिंह यांचे पुत्र विक्रमजित चौधरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

आमदार विक्रमजित चौधरी म्हणाले की, रुग्णवाहिकेतून नेत असताना पंप केल्यावर माझे वडीस श्वास घेत होते. तेवढ्यात तिथे असलेल्या डॉक्टरांनी आम्हाला बाजूला होण्यास सांगितले. मात्र या डॉक्टरांकडे आणीबाणीच्या परिस्थितीत शॉक देण्यासाठी कुठलेही साहित्य नव्हते. तेथील डॉक्टर खूप गडबडीत होते. संतोख सिंह यांनी आयुष्यात केवळ डोळ्यांची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. एवढंच नाही तर विक्रमजित चौधरींसह विरोधी पक्षांनीही या घटनेसाठी आम आदमी पक्षाला दोषी ठरवले आहे.

या घटनेबाबत भाजपाचे नेते आणि माजी मंत्री  मनोरंजन कालिया यांनी सांगितले की, उपचारांमध्ये दिरंगाई झाली. त्यासाठी आम आदमी पक्ष जबाबदार आहे. संतोख सिंह यांना जर वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता आले असते. राहुल गांधी यांच्या मागे जी रुग्णवाहिका चालत होती तिच्यामध्ये पुरेशी व्यवस्थाच नव्हती. याची थेट जबाबदारी आम आदमी पक्षाची आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची आहे.

कालिया पुढे म्हणाले की, किमान व्हीआयपींसाठी तरी पुरेशी व्यवस्था असली पाहिजे होती. जिथे झोपायची जागा होती, तिथे सामान पडलेले होते. तसेच डॉक्टर गडबडीत एकमेकांकडे पाहत होते. हे डॉक्टर अशा आणीबाणीसाठी प्रशिक्षित नव्हते.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसPunjabपंजाब