शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 23:48 IST

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रापंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूनंतर हल्का फिल्लौर येथील आमदार आणि संतोख सिंह यांचे पुत्र विक्रमजित चौधरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

आमदार विक्रमजित चौधरी म्हणाले की, रुग्णवाहिकेतून नेत असताना पंप केल्यावर माझे वडीस श्वास घेत होते. तेवढ्यात तिथे असलेल्या डॉक्टरांनी आम्हाला बाजूला होण्यास सांगितले. मात्र या डॉक्टरांकडे आणीबाणीच्या परिस्थितीत शॉक देण्यासाठी कुठलेही साहित्य नव्हते. तेथील डॉक्टर खूप गडबडीत होते. संतोख सिंह यांनी आयुष्यात केवळ डोळ्यांची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. एवढंच नाही तर विक्रमजित चौधरींसह विरोधी पक्षांनीही या घटनेसाठी आम आदमी पक्षाला दोषी ठरवले आहे.

या घटनेबाबत भाजपाचे नेते आणि माजी मंत्री  मनोरंजन कालिया यांनी सांगितले की, उपचारांमध्ये दिरंगाई झाली. त्यासाठी आम आदमी पक्ष जबाबदार आहे. संतोख सिंह यांना जर वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता आले असते. राहुल गांधी यांच्या मागे जी रुग्णवाहिका चालत होती तिच्यामध्ये पुरेशी व्यवस्थाच नव्हती. याची थेट जबाबदारी आम आदमी पक्षाची आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची आहे.

कालिया पुढे म्हणाले की, किमान व्हीआयपींसाठी तरी पुरेशी व्यवस्था असली पाहिजे होती. जिथे झोपायची जागा होती, तिथे सामान पडलेले होते. तसेच डॉक्टर गडबडीत एकमेकांकडे पाहत होते. हे डॉक्टर अशा आणीबाणीसाठी प्रशिक्षित नव्हते.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसPunjabपंजाब