शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या पुरासाठी ‘बिहारी’ जबाबदार, CM सुक्खू यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 20:25 IST

Himachal Pradesh: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या भूस्खलनासाठी सुक्खू यांनी बिहारी आर्किटेक्ट्सना जबाबदार धरले होते. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावरही हा विषय वादाचं केंद्र बनलं आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितलं की, निर्मिती कामांसाठी अन्य राज्यांमधून लोक येत आहे. ते शास्त्रीय पद्धतींचा अवलंब न करता मजल्यावर मजले चढवत आहेत. बाहेरील आर्किटेक्ट्स येतात. ज्यांना मी बिहारी आर्किटेक्ट्स संबोधतो. ते आले आणि फ्लोअरवर फ्लोअर बांधत गेले. त्यामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये आपत्ती येत आहेत.

सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या या विधानावर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते विनोद तावडे यांनी सुक्खू यांच्यावर टीका करताना लिहिले आहे की, देश तोडण्याच्या प्रयत्नात असलेली काँग्रेस आता हिमाचल प्रदेशला प्रादेशिकतेच्या आगीत झोकत आहेत. बिहारींना दोषी ठरवून मुख्यमंत्री सुक्खू यांनी आपला हेतू जाहीर केला आहे. मात्र बिहारमधील आघाडीचे नेते मौन बाळगून आहेत. कदाचित त्यांना काँग्रेसच्या युवराजांचं भय वाटत आहे.

मात्र वाद वाढत असल्याचे पाहून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हे विधान फेटाळून लावले. मी असं काही बोललेलो नाही. ते आमच्यासाठी भावासारखे आहेत, अशी सारवासारव केली. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार