शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या पुरासाठी ‘बिहारी’ जबाबदार, CM सुक्खू यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 20:25 IST

Himachal Pradesh: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या भूस्खलनासाठी सुक्खू यांनी बिहारी आर्किटेक्ट्सना जबाबदार धरले होते. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावरही हा विषय वादाचं केंद्र बनलं आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितलं की, निर्मिती कामांसाठी अन्य राज्यांमधून लोक येत आहे. ते शास्त्रीय पद्धतींचा अवलंब न करता मजल्यावर मजले चढवत आहेत. बाहेरील आर्किटेक्ट्स येतात. ज्यांना मी बिहारी आर्किटेक्ट्स संबोधतो. ते आले आणि फ्लोअरवर फ्लोअर बांधत गेले. त्यामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये आपत्ती येत आहेत.

सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या या विधानावर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते विनोद तावडे यांनी सुक्खू यांच्यावर टीका करताना लिहिले आहे की, देश तोडण्याच्या प्रयत्नात असलेली काँग्रेस आता हिमाचल प्रदेशला प्रादेशिकतेच्या आगीत झोकत आहेत. बिहारींना दोषी ठरवून मुख्यमंत्री सुक्खू यांनी आपला हेतू जाहीर केला आहे. मात्र बिहारमधील आघाडीचे नेते मौन बाळगून आहेत. कदाचित त्यांना काँग्रेसच्या युवराजांचं भय वाटत आहे.

मात्र वाद वाढत असल्याचे पाहून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हे विधान फेटाळून लावले. मी असं काही बोललेलो नाही. ते आमच्यासाठी भावासारखे आहेत, अशी सारवासारव केली. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार