शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

विरोधाला सकारात्मकता, अभ्यासाची जोड द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 06:39 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारतीय छात्र संसद परिषदेचे उद्घाटन

उमेश जाधव 

नवी दिल्ली : सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सकारात्मकता व अभ्यासाची जोड गरजेची आहे. विरोध करताना तरुणांनी हिंसेकडे वळू नये आणि सर्व मुख्य समस्यांचा विचार, अभ्यास करून जबाबदारी स्वीकारून राजकीय क्षेत्रात उतरावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. दहाव्या भारतीय छात्र संसद परिषदेचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपतींनी तरुणांना मार्गदर्शन केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, पुणे आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्यातर्फे झालेल्या परिषदेत लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदचे समन्वयक राहुल कराड यावेळी उपस्थित होते.तरुणाला शिक्षित, प्रेरित करण्याची गरज आहे. छात्र संसदेचा तरुणांच्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मात्र, त्यासाठी तरुणांनी समाजातील बदल, आर्थिक, विकास या मुद्द्यांचा स्वत:हून अभ्यास करावा. सत्ताधारी योजना मांडतात, विरोधक विरोध करतात आणि सभागृह बंद पाडतात हे पाहणे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगून मातृभाषेतच बोला असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.दरडोई उत्पन्न वाढविण्यावर असावा भरएमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी शाल व स्मृतीचिन्ह देऊन विजय दर्डा यांचा सत्कार केला. दर्डा म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्था सावरून जीडीपी आठच्याही वर नेला. मोदीही तोच प्रयत्न करीत आहेत. त्याला विदेशी गुंतवणुक, रोजगार निर्मिती याची जोड आवश्यक आहे. पंतप्रधानांनी स्वप्न बघितले आहे व स्वप्न बघितल्याशिवाय, उद्दिष्ट ठेवल्याशिवाय काही निर्माण करता येत नाही.या कार्यक्रमात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे, त्याचप्रमाणे देशाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यावरही त्यांनी भर द्यायला हवा. छात्र संसदेत ‘५ ट्रिलियन अर्थव्यवस्था : आव्हाने आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.पण अर्थव्यवस्थेचा आकार वाढवून देश समृद्ध होईल का, आनंदी होईल का? या आकाराने विकासाचे द्वार खुले होईल का? याचाही विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आकाराने मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका, जापान, चीन आदी देशांचेही उदाहरण दिले. भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल कराड यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.परिवर्तनासाठी लढणारा प्रत्येकजण ‘हिरो’ -सत्यार्थीसमाजातील वेदना समजून घेऊन परिवर्तनासाठी लढणारा प्रत्येक व्यक्ती ‘हिरो’ आहे. मात्र, हे परिवर्तन सहज शक्य नसून त्यासाठी संघर्षाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. देशात लहान मुले, मुली सुरक्षित राहू शकत नसतील तर तुम्हाला संताप यायला हवा, असेही ते म्हणाले.परिश्रमाला पर्याय नाही - डॉ. माशेलकरजीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमांना पर्यायच नाही. शिक्षण हे भविष्य आहे. मात्र, शिक्षणात सातत्य असल्याशिवाय प्रगती शक्य नाही, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितलेग्रामीण भागात कामाची गरज - डॉ. भटकरमहात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असे म्हटले होते. मात्र, आजही ग्रामीण भागात अनेक प्रश्न कायम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. विज्ञानालाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूdelhiदिल्ली