शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवा, केंद्राची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 05:28 IST

८३ जिल्ह्यांत आयसीएमआरने केले सर्वेक्षण

एस.के. गुप्ता 

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने देशातील कोरोना साथीचा फैलाव व या आजाराशी मुकाबला करण्यासाठी लोकांमध्ये असलेली प्रतिकारशक्ती यांचा अभ्यास करण्यासाठी ८३ जिल्ह्यांतील २६,४०० लोकांचे सिरॉलॉजिकल सर्वेक्षण केले. देशामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा अशी शिफारस आयसीएमआरने या सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे केली आहे. या सर्वेक्षणासाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीने कोरोना चाचणीसाठी बनविलेल्या एलिसा कीटचा वापर करण्यात आला. शरीरात विषाणूंशी लढण्यासाठी असलेल्या अँटीबॉडीजबद्दल या चाचणीतून माहिती मिळते.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाशी देशाला अजून अनेक महिने सामना करावा लागणार आहे हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांना कोरोना साथीपासून मोठा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे त्यासंदर्भातील चाचणीतून लक्षात येते. संसर्गाशी लढण्याकरिता शरीरातील अँटीबॉडीज मदत करतात.भार्गव यांनी सांगितले की, देशातील हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील एक तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अनेक रुग्ण कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातून तशा प्रभावी अँटीबॉडीज सर्वेक्षणादरम्यान मिळाल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कंटेनमेंट क्षेत्रात साथीचा झालेला फैलाव १०० ते २०० पट अधिक आहे. मुंबई, इंदूरसारख्या शहरांमध्ये ही स्थिती आहे. म्हणजे जितके रुग्ण आढळून आले, त्याच्या पेक्षा न सापडलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.इतरांच्या तुलनेत मृत्यूदर कमीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. देशात प्रत्येक एक लाखांमागे ०.५९ इतकाच मृत्यूदर आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, आयसीएमआरने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात कोरोना स्थितीसंदर्भात सिरॉलॉजिकल सर्वेक्षण केले होते. लॉकडाऊन लागू झाल्यानंतरच्या पाच आठवड्यापर्यंत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजच्या स्थितीची माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध झाली आहे.अनेक लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊनही त्यांचा आजार कोणतेही उपचार न घेता आपोआप बरा झाला. कोरोनाचा मोठा फैलाव झालेल्या भागांत १५ ते ३० टक्के लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार