शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवा, केंद्राची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 05:28 IST

८३ जिल्ह्यांत आयसीएमआरने केले सर्वेक्षण

एस.के. गुप्ता 

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने देशातील कोरोना साथीचा फैलाव व या आजाराशी मुकाबला करण्यासाठी लोकांमध्ये असलेली प्रतिकारशक्ती यांचा अभ्यास करण्यासाठी ८३ जिल्ह्यांतील २६,४०० लोकांचे सिरॉलॉजिकल सर्वेक्षण केले. देशामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा अशी शिफारस आयसीएमआरने या सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे केली आहे. या सर्वेक्षणासाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीने कोरोना चाचणीसाठी बनविलेल्या एलिसा कीटचा वापर करण्यात आला. शरीरात विषाणूंशी लढण्यासाठी असलेल्या अँटीबॉडीजबद्दल या चाचणीतून माहिती मिळते.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाशी देशाला अजून अनेक महिने सामना करावा लागणार आहे हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांना कोरोना साथीपासून मोठा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे त्यासंदर्भातील चाचणीतून लक्षात येते. संसर्गाशी लढण्याकरिता शरीरातील अँटीबॉडीज मदत करतात.भार्गव यांनी सांगितले की, देशातील हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील एक तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अनेक रुग्ण कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातून तशा प्रभावी अँटीबॉडीज सर्वेक्षणादरम्यान मिळाल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कंटेनमेंट क्षेत्रात साथीचा झालेला फैलाव १०० ते २०० पट अधिक आहे. मुंबई, इंदूरसारख्या शहरांमध्ये ही स्थिती आहे. म्हणजे जितके रुग्ण आढळून आले, त्याच्या पेक्षा न सापडलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.इतरांच्या तुलनेत मृत्यूदर कमीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. देशात प्रत्येक एक लाखांमागे ०.५९ इतकाच मृत्यूदर आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, आयसीएमआरने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात कोरोना स्थितीसंदर्भात सिरॉलॉजिकल सर्वेक्षण केले होते. लॉकडाऊन लागू झाल्यानंतरच्या पाच आठवड्यापर्यंत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजच्या स्थितीची माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध झाली आहे.अनेक लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊनही त्यांचा आजार कोणतेही उपचार न घेता आपोआप बरा झाला. कोरोनाचा मोठा फैलाव झालेल्या भागांत १५ ते ३० टक्के लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार