शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचं बांधकाम अधांतरी, कामावर परतण्यास कारागिरांचा नकार? मंदिर समितीची चिंता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:17 IST

Ram Mandir Construction Work Latest Update: अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामध्ये मोठा अडथळा आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून राम मंदिराच्या बंधाकामाचा वेग मंदावला आहे. तसेच मंदिर उभारण्याचं काम अधांतरी लटकलं आहे.

अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामध्ये मोठा अडथळा आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून राम मंदिराच्या बंधाकामाचा वेग मंदावला आहे. तसेच मंदिर उभारण्याचं काम अधांतरी लटकलं आहे. राम मंदिराचं बांधकाम करत असलेल्या कारागिरांमुळे मंदिराचं काम रखडल्याचं समोर आलं आहे. हे कारागिक आपापल्या घरी परतले असून, ते पुन्हा मंदिराच्या कामासाठी परत येण्यास उत्सूक नाही आहेत. मंदिराचं बांधकाम करण्याची जबाबदारी घेतलेल्या एल अँड टी कंपनीचं म्हणणंही ऐकण्यास हे कारागिर तयार नाही आहेत. या सर्व घडामोडींची गंभीर दखल राम मंदिर बांधकाम समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी कंपनीला लवकरात लवकर २०० कारागिरांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या कारागिरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. मागच्या ३ महिन्यांपासून राम मंदिराच्या उभारणीचं काम मंदावलं आहे. त्यामुळे राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण करण्यासाठी जी तारीख निश्चित करण्यासाठी जी तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यापेक्षा दोन महिने अधिक वेळ लागू शकतो. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२४ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता कारागिरांची कमतरता भासत असल्याने मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागू शकतो.  

राम मंदिराचं बांधकाम करत असलेल्या कारागिरांची टंचाई निर्माण होण्यामागे येथील तीव्र उन्हाळा हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे येथील कामगार आपापल्या घरी परतले. मात्र आता त्यांना माघारी कामावर आणण्यात मंदिराचं काम करणाऱ्या कंपनीला यश येत नाही आहे. याबाबत काल एक बैठकही बोलावण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये राम मंदिर निर्मिती समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्र यांनी कंपनीला सांगितलं की, राम मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंती मुदत निश्चित करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसाची उभारणी करणं हे मुख्य आव्हान आहे. दुसऱ्या मजल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कळस उभारता येणार आहे. 

याच गतीने बांधकाम सुरू राहिलं, तर मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यास २ महिने विलंब होऊ शकतो. त्यामुळे एल अँड टी कंपनीने कारागिरांची संख्या त्वरित वाढवावी. तसेच मागच्या तीन महिन्यांपासून मंदावलेला राम मंदिराच्या उभारणीचा वेग वाढवावा, असे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश