शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचं बांधकाम अधांतरी, कामावर परतण्यास कारागिरांचा नकार? मंदिर समितीची चिंता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:17 IST

Ram Mandir Construction Work Latest Update: अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामध्ये मोठा अडथळा आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून राम मंदिराच्या बंधाकामाचा वेग मंदावला आहे. तसेच मंदिर उभारण्याचं काम अधांतरी लटकलं आहे.

अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामध्ये मोठा अडथळा आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून राम मंदिराच्या बंधाकामाचा वेग मंदावला आहे. तसेच मंदिर उभारण्याचं काम अधांतरी लटकलं आहे. राम मंदिराचं बांधकाम करत असलेल्या कारागिरांमुळे मंदिराचं काम रखडल्याचं समोर आलं आहे. हे कारागिक आपापल्या घरी परतले असून, ते पुन्हा मंदिराच्या कामासाठी परत येण्यास उत्सूक नाही आहेत. मंदिराचं बांधकाम करण्याची जबाबदारी घेतलेल्या एल अँड टी कंपनीचं म्हणणंही ऐकण्यास हे कारागिर तयार नाही आहेत. या सर्व घडामोडींची गंभीर दखल राम मंदिर बांधकाम समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी कंपनीला लवकरात लवकर २०० कारागिरांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या कारागिरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. मागच्या ३ महिन्यांपासून राम मंदिराच्या उभारणीचं काम मंदावलं आहे. त्यामुळे राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण करण्यासाठी जी तारीख निश्चित करण्यासाठी जी तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यापेक्षा दोन महिने अधिक वेळ लागू शकतो. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२४ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता कारागिरांची कमतरता भासत असल्याने मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागू शकतो.  

राम मंदिराचं बांधकाम करत असलेल्या कारागिरांची टंचाई निर्माण होण्यामागे येथील तीव्र उन्हाळा हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे येथील कामगार आपापल्या घरी परतले. मात्र आता त्यांना माघारी कामावर आणण्यात मंदिराचं काम करणाऱ्या कंपनीला यश येत नाही आहे. याबाबत काल एक बैठकही बोलावण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये राम मंदिर निर्मिती समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्र यांनी कंपनीला सांगितलं की, राम मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंती मुदत निश्चित करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसाची उभारणी करणं हे मुख्य आव्हान आहे. दुसऱ्या मजल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कळस उभारता येणार आहे. 

याच गतीने बांधकाम सुरू राहिलं, तर मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यास २ महिने विलंब होऊ शकतो. त्यामुळे एल अँड टी कंपनीने कारागिरांची संख्या त्वरित वाढवावी. तसेच मागच्या तीन महिन्यांपासून मंदावलेला राम मंदिराच्या उभारणीचा वेग वाढवावा, असे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश