शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:21 IST

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली

जम्मू - जम्मू काश्मीर हायकोर्टाने एका पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्या ८ भाऊ बहि‍णींना पाकिस्तानात पाठवण्यावर बंदी आणली आहे. हे सर्व जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत असं हायकोर्टाने मानले आहे. अधिकाऱ्यांना या सगळ्यांना पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगत डिपोर्ट करण्याची नोटीस दिली होती. आता हे कुटुंब पंजाबच्या अटारी बोर्डरवरून जम्मूच्या पुंछ जिल्ह्यात त्यांच्या घरी परतले आहे. हेड कॉन्स्टेबल आणि कुटुंबाने सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे हायकोर्टाने हा निर्णय दिला. कागदपत्रानुसार हे कुटुंब पुंछ जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

कोर्ट काय म्हणालं?

न्यायाधीश राहुल भारती यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर आदेशात म्हटलं की, याचिकाकर्त्यांना केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर सोडण्यास सांगू नये, ना त्यांच्यावर दबाव आणावा. अली मागील २७ वर्षापासून पोलीस विभागात कार्यरत आहेत. सध्या ते वैष्णोदेवी मंदिराच्या कटरा चौकीत तैनात आहेत. महसूल विभागाच्या कागदपत्रानुसार ते जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना पुढील २ आठवड्यात एक विस्तृत रिपोर्ट सादर करण्यास सांगितले. या प्रकरणाची सुनावणी २० मे रोजी होणार आहे. 

प्रकरण काय?

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली. हे सर्व पाकिस्तानी नागरिक असल्याचा प्रशासनाचं म्हणणं होते. पोलिसांनी या सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलावले आणि तिथून अटारी पाठवले गेले. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू झाली. या कार्यवाहीत इफ्तियार अली जे मागील २६ वर्ष जम्मू काश्मीर पोलीस दलात आहेत. त्यांना पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगत नोटीस पाठवली. याविरोधात अली यांनी हायकोर्टात धाव घेतली. 

कुठे राहत होते अलीचे वडील?

डिपोर्टेशनविरोधात आंदोलन करणारे कार्यकर्ते सफीर चौधरी यांनी अलीचे वडील फकर दीन हे मूळचे सलवाह गावचे रहिवासी होते हे सांगितले. १९६५ च्या युद्धात या गावचा निम्मा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्यामुळे दीन आणि त्यांची पत्नी फातिमा यांना पीओकेमध्ये शरण जावे लागले. तिथे एका रिफ्यूजी कॅम्पमध्ये ३ मुलांसह ते राहायचे. अलीसह आणखी ६ मुले तिथे जन्मले. १९८० च्या दशकात हे कुटुंब पुन्हा पुंछ जिल्ह्यात परतले. इथं आल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने त्यांना काश्मीरचे रहिवासी असल्याचं मान्य केले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला