शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

मणिपूर हिंसेच्या मागे षडयंत्र; CM योगींनी 'त्या' व्हिडिओच्या टायमिंगवरही उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 20:15 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मणिपूर हिंसाचारामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

Manipur Violence: मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावरुन विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. महिलांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारविरोधात संतापाची लाट आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्या महिलांच्या व्हिडिओवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले. 

पॉडकास्टमध्ये यूपीच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बनवत आहेत. मणिपूरमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार झाला आणि त्यानंतर महिलांवर सामूहिक बलात्कार झाला, या मुद्द्यावरून विरोधक भाजप सरकारवर टीका करत आहेत. 

काय म्हणाले योगी?यावर सीएम योगी म्हणाले की, गेल्या 9 वर्षांत ईशान्येकडील राज्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम सरकारने केले आहे. मात्र या काळात शेजारील देशांनी कटकारस्थान केले, त्याचे पुरावेही मिळाले आहेत. जेव्हा एखादी यंत्रणा विनाकारण हस्तक्षेप करते, तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, याची मला खात्री द्यायची आहे. प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षा प्रदान करणे, हे कोणत्याही सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. आमचे सरकारही या दिशेने काम करत आहे.

व्हिडिओच्या वेळेवर उपस्थित केला प्रश्न मुख्यमंत्री योगी यांनी मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर दोन महिने सुरक्षित ठेवला आणि ज्या दिवशी अधिवेशन आहे, तेव्हाच व्हायरल का केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, शांतता बिघडवण्याचा आणि देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकशाही चिरडणाऱ्या लोकांचे हे षडयंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेस