शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनागमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे आयएस कनेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 15:15 IST

अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चकमकीत ठार मारलेल्या दहशतवाद्यांचा खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी एस.पी. वैद्य यांनी या दहशतवाद्यांचा इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ठार मारण्यात आलेले सर्व दहशतवादी काश्मीरमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, या दहशतवाद्यांचा आयएसजेके या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आल्याने संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या माहितीमुळे इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीरमध्ये हातपाय पसरत असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे. 

 श्रीगुफारा येथील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा होणे, हे लष्करासाठी मोठे यश मानण्यात येत आहे. गेल्या वर्षी सात नोव्हेंबरमध्ये जम्मू काश्मीरमधील जकूरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले होते.  इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर ही आयएसआसएचचीच एक उपशाखा असल्याचे मानले जाते. ही संघटना भारतातील तरुणांना इस्लामच्या नावावर भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांत गुंतवण्याचे काम करते. भारतात आयएसचे अस्तित्व नसल्याचे भारत सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आज समोर आलेल्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरISISइसिसTerrorismदहशतवाद