शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 10:45 IST

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असं विधान केले. त्याचसोबत आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा करू. त्यात राज्यातील नेते नसतील असं म्हटलं होते. मात्र त्यावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला. आता नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाबाबत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दिल्लीच्या काँग्रेस बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस २२, शिवसेना ठाकरे गट १८, राष्ट्रवादी शरद पवार गट ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला २ जागा सोडण्यात येतील. हा फॉर्म्युला काँग्रेसकडून समोर आला आहे. दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींनी आढावा घेतला. त्यात राज्यातील नेते कोणकोणत्या जागा लढवू इच्छितात, कोणत्या जागांसाठी इच्छुक आहेत यावर चर्चा झाली. या बैठकीतून काँग्रेस २२ जागांसाठी आग्रही असल्याचे दिसते. ठाकरे गटाला २३ जागा हव्या होत्या परंतु काँग्रेसची इतक्या जागा सोडण्याची तयारी नसल्याचे दिसून येते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. 

२०१९ नंतरच्या घडामोडीत अनेक पक्षांची राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढून १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता ती स्थिती नाही. त्यात उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्ष फुटलेला आहे. या दोन्ही गटाचे चिन्ह कोणते असेल हेदेखील अद्याप निश्चित नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झुकतं माप द्यावे आणि विधानसभा तसेच प्रादेशिक निवडणुकीत उद्धव ठाकरे-शरद पवार गटाला झुकतं माप द्यावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यात काँग्रेसनं विजय मिळवत सरकार बनवलं आहे. त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यात मविआच्या जागावाटपात काँग्रेस २२ जागांसाठी आग्रही राहणार असल्याचं कळालं आहे. 

दरम्यान, शरद पवार-उद्धव ठाकरे गटात मातोश्रीत बैठक झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाकडून १०-११ जागा लढण्याची तयारी आहे. त्यात शिरूर, सातारा, माढा, बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड, भिवंडी, अहमदनगर या जागांसाठी पवार गट आग्रही आहे. जानेवारीत पुन्हा ठाकरे-पवार गटात बैठक होणार आहे. एकीकडे दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आणि दुसरीकडे ठाकरे-पवार बैठक यामुळे जास्तीच्या जागा घेण्यासाठी मविआच्या सर्वच पक्षात चढाओढ लागल्याचं दिसून येते. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते आग्रही आहेत. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारlok sabhaलोकसभा