शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 20:45 IST

राजस्थानात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसने १०३० जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये काँग्रेसशी जोरदार मुसंडीस्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये काँग्रेस आघाडीवरमुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मानले मतदारांचे आभार

जयपूर :राजस्थानात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसने १०३० जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवली आहे. राजस्थानमध्ये ग्रामपंचायतीच्या ३०५९ जागांसाठी २८ जानेवारी रोजी निवडणुका झाल्या होत्या. सर्व जागांचे निकाल अद्याप घोषित झालेले नाहीत. 

राजस्थानमध्ये ग्रामपंचायतीच्या ३०५९ जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. यापैकी २६५० जागांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यात ६७० जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. एकूण निकाल जाहीर झालेल्या जागांपैकी १०३० जागा जिंकून काँग्रेस पक्ष आघाडीवर असून, भाजपला ९५० जागांवर विजय मिळाला आहे. 

पतीची हत्या केली असेल तरी पत्नी फॅमिली पेन्शनसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निकाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री गोविंद डोटासरा यांच्या लक्ष्मणगड येथे काँग्रेस आणि भाजपला समसमान जागांवर विजय मिळाला आहे. येथे कोणाचे पारडे जड होणार हे अपक्षावर अवलंबून असणार आहे. भंवर सिंह भाटी यांच्या देशनोक भागात काँग्रेस विजयी झाली आहे. देशनोक येथील एकूण २५ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेस तर १० जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. 

काँग्रेस पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या नेत्यांनीही मेहनत घेतली. काँग्रेस पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबाबत सर्व मतदारांचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी आभार मानले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारणElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा