शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

‘काँग्रेस २१ दिवसांमध्ये नक्की करणार उमेदवार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:52 IST

येत्या २१ दिवसांत म्हणजेच या महिनाअखेरीस काँग्रेस आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : येत्या २१ दिवसांत म्हणजेच या महिनाअखेरीस काँग्रेस आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरचिटणिसांच्या बैठकीत विचारविनिमय करून ही घोषणा करताना सांगितले की, यंदा अनुभवी नेत्यांबरोबरच अनुसूचित जाती-जमाती, तरुण तसेच महिलांना प्राधान्य दिले जाईल.पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपालन यांनी सांगितले की, या बैठकीत सरचिटणिसांनी आपल्या राज्यातील स्थितीची माहिती दिली. त्यानंतर राहुल यांनी सांगितले की, आपण द्वेषजनक प्रचार करू नये. निवडणुकांचे महत्त्व सांगताना राहुल गांधी म्हणाले की, प्राणाची बाजी लावू, पण भाजपाला सत्तेतून बाहेर फेकू, या पद्धतीने आपण लढायचे आहे. सरचिटणीस प्रियंका गांधी बैठकीत म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात आपले स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण धर्म व जातींवर आधारित राजकारण तोडणे गरजेचे आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य सिंदिया ११ फेब्रुवारी रोजी लखनऊला सर्व जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील. प्रियंका गांधी व ज्योतरादित्य सिंदिया तीन दिवस तिथे राहणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण