शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

"काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:34 AM

उत्तर प्रदेशात शेतकरी पंचायतीला उपस्थिती

लखनौ : काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी सहारणपूर येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केले. ही शेतकरी पंचायत काँग्रेसने आयोजित केली होती. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोदी सरकार अपमान करीत आहे.   शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकार काम करीत आहे, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला. हे तिन्ही कायदे राक्षसी असून, ते ताबडतोब रद्द होणे आवश्यक आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष सतत लढत राहील. काँग्रेस सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने लढत राहिला आहे.   कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मेळावे आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यातील हा पहिला मेळावा होता. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागावर जोर देण्याचे ठरविले आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याची ही तयारी आहे. प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी आहे.सहारणपूर जिल्ह्यातील चिलकाना येथे बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किसान महापंचायतला उपस्थित होत्या. (इन्सेटमध्ये) राजस्थानमधील काँग्रेसच्या विधानसभा सदस्य इंदिरा मीना या बुधवारी जयपूरमध्ये विधानसभेत लक्षवेधीरीत्या पोहोचल्या. मीना या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ट्रॅक्टरवर आल्या होत्या.शेतकऱ्यांचे आंदोलन जमीन, देश आणि मुलांसाठी...प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘शेतकरी आंदोलन करीत आहेत, ते स्वत:चे जीवन, जमीन, देश आणि मुलांसाठी. जी व्यक्ती त्यांची थट्टा करते, त्यांना दहशतवादी व देशद्रोही ठरवले. ती कधीही देशभक्त असत नाही की, असणारही नाही. सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही साखर कारखान्यांकडून त्यांना पैसे मिळालेले नाहीत.’

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलन