शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:45 IST

'एससी-एसटी कायदा मजबूत करुन आम्ही दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि बांधिलकी दाखवली. काँग्रेसने जातीवादाचे विष पेरले.'

PM Narendra Modi in Rajyasabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 5 वा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेनंतर आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या मॉडेलमध्ये फक्त कुटुंबाला प्राधान्य दिले जाते. पण, आमच्या मॉडेलमध्ये देशाला प्राधान्य दिले जाते, अशी टीका पीएम मोदींनी केली. 

सबका साथ, सबका विकास काँग्रेसला कधीच कळणार नाहीओबीसी आयोगाच्या घटनात्मक दर्जाचा उल्लेख करत पीएम मोदी म्हणाले की, ओबीसींचा सन्मान आणि आदर आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. देशात ज्या ज्या वेळी आरक्षणाचा मुद्दा आला, तेव्हा त्याला योग्य पद्धतीने सामोरे जाण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. आमच्या सरकारने पहिल्यांदाच सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना 10 टक्के आरक्षण दिले. हे कोणाकडूनही हिसकावून न घेता दिले. एससी-एसटी, ओबीसींनीही त्याचे स्वागत केले. संपूर्ण देशाने हे मान्य केले.

आपल्या देशात दिव्यांगांचे कधीच ऐकून घेतले गेले नाही. पण, आम्ही दिव्यांगांच्या आरक्षणाचा विस्तार केला, योजना तयार केल्या आणि अंमलातही आणल्या. आम्ही ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांबाबत प्रामाणिक प्रयत्न केले. सबका साथ, सबका विकास हा मंत्र आम्ही सत्यात उतरवून दाखवला. पण, काँग्रेसला याचा अर्थ कधीच समजणार नाही. स्त्री शक्तीचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना संधी मिळाली तर देशाच्या प्रगतीला अधिक गती मिळू शकेल. यासाठी आम्हीच नारी शक्ती वंदन कायदा आणला, असं मोदी म्हणाले. 

2014 मध्ये आम्ही देशाला पर्यायी मॉडेल दिलेपीएम मोदी पुढे म्हणतात, 2014 मध्ये आम्ही देशाला पर्यायी मॉडेल दिले. आम्ही समाधानाचे मॉडेल दिले आहे, तुष्टीकरणाचे नाही. निवडणुका आल्या की छोट्या वर्गाला काहीतरी द्यायचे आणि नंतर काहीच नाही, अशी काँग्रेसची पद्धत होती. फक्त मतांचे राजकारण करण्यावर त्यांचा भर होता. भारताकडे जे काही संसाधने आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपल्याजवळ जो काही वेळ आहे, तो वाया जाण्यापासून वाचवून प्रत्येक क्षणाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. कोणतीही योजना असो, ती ज्यांच्यासाठी बनवली, त्याचा 100 टक्के लाभ मिळायला हवा. एससी-एसटी कायदा मजबूत करून आमच्या सरकारने दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि बांधिलकी दाखवली. पण, काँग्रेसकडून आज जातीवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस