शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:50 IST

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ‘मनरेगा’ योजनेद्वारे१४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त केले आहे. आता ही ‘न्याय’ योजना राबवून पाच कोटी गरीब कुटुंबांमधील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून दारिद्र्य निर्मूलनाची लढाई निर्णायकपणे जिंकू, असा दावा त्यांनी केला.काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीनंतर गांधी यांनी पत्रकार परिषदेत योजनेचा तपशील जाहीर केला.राहुल म्हणाले की, कोणालाही काम न करता घरी बसून पैसे देण्याची ही योजना नाही. आताही प् ा्रत्येक जण काम करतच आहे यापुढेही तो करत राहील. पण ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे ते कितीही प्रयत्न केले तरी गरिबीतच खितपत राहतात. सरकार त्यांना एका ठराविक उत्त्पन्नाच्या मर्यादेपर्यंत आणून दारिद्र्याच्या नष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास मदत करेल. भविष्यात जेव्हा किमान १२ हजार रुपये मासिक उत्पन्न नसेलेले एकही कुटुंब देशात शिल्लक राहणार नाही, तेव्हा या योजनेची गरजच राहणार नाही व ती बंद होईल.ही योजना टप्प्याटप्याने राबविली जाईल. आधी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवून सुरुवात केली जाईल व नंतर ती देशभर राबविली जाईल, असेही सांगून ते म्हणाले की, काँग्रेसला गरीब नव्हे तर गरीबी नष्ट करायची आहे. ‘मनरेगा’ हा ‘गरीबी हटाव’चा पहिला टप्पा होता. आता ‘न्याय’हा दुसरा व निर्णायक टप्पा असेल.ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? यासाठी पैसा कुठून आणणार? या प्रश्नांना उत्तर देताना गांधी म्हणाले की, सखोल विचार करून आम्ही ही योजना तयार केली आहे. त्यासाठी जगातील उत्तमोत्तम अर्थतज्ज्ञांचा विचार व सल्ला घेण्यात आला आहे. देशाची सध्याची वित्तीय क्षमता पाहता या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे ही अशक्य कोटीतील बाब नाही, हे त्यांनीही मान्य केले आहे. योजनेचा तपशील करण्याचे काम सुरू आहे. देशात चांगल्या कामांसाठी मुबलक पैसा आहेकोणत्याही देशात कधीही राबविली न गेलेली अशी ही योजना आहे. ती सादर करण्याचा आजचा दिवस काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, असेही राहुल म्हणाले. आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली व सत्तेवर येताच ती लागूही केली. त्याचप्रमाणे गरिबांना ‘न्याय’ देण्याचे हे वचनही काँग्रेस पूर्ण करेल, असे ते म्हणाले.भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी श्रीमंतांचा व गरिबांचा असे दोन भारत तयार करीत आहेत. शेतकऱ्यांना रोज तीन रुपये देण्याची थट्टा करूनही ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. स्वत:च्या खासगी विमानांमधून फिरणाऱ्या उद्योगपतींसाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण काँग्रेस हाच पैसा गरिबांसाठी वापरण्यास कटिबद्ध आहे.योजनेचा हा आहे तपशीलराहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात गरीब २० टक्के कुटुंबांना दरमहा किमान १२ हजार रुपये उत्पन्न असणे हे या योजनेचे मुख्य सूत्र असेल. उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न सहा हजार रुपये असेल तर त्या कुटुंबाला दरमहा सहा हजार रुपये देऊन सरकार किमान १२ हजार रुपयांची पूर्तता करेल. लाभार्थी कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२ हजारांहून जेवढे कमी असेल, त्या फरकाची पूर्तता सरकार करेल. अशा प्रकारे या पाच कोटी कुटुंबाना सरकारकडून वर्षाला कमाल ७२ हजार रुपये दिले जातील. उत्पन्नपूर्तीची ही रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक