शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:50 IST

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ‘मनरेगा’ योजनेद्वारे१४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त केले आहे. आता ही ‘न्याय’ योजना राबवून पाच कोटी गरीब कुटुंबांमधील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून दारिद्र्य निर्मूलनाची लढाई निर्णायकपणे जिंकू, असा दावा त्यांनी केला.काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीनंतर गांधी यांनी पत्रकार परिषदेत योजनेचा तपशील जाहीर केला.राहुल म्हणाले की, कोणालाही काम न करता घरी बसून पैसे देण्याची ही योजना नाही. आताही प् ा्रत्येक जण काम करतच आहे यापुढेही तो करत राहील. पण ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे ते कितीही प्रयत्न केले तरी गरिबीतच खितपत राहतात. सरकार त्यांना एका ठराविक उत्त्पन्नाच्या मर्यादेपर्यंत आणून दारिद्र्याच्या नष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास मदत करेल. भविष्यात जेव्हा किमान १२ हजार रुपये मासिक उत्पन्न नसेलेले एकही कुटुंब देशात शिल्लक राहणार नाही, तेव्हा या योजनेची गरजच राहणार नाही व ती बंद होईल.ही योजना टप्प्याटप्याने राबविली जाईल. आधी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवून सुरुवात केली जाईल व नंतर ती देशभर राबविली जाईल, असेही सांगून ते म्हणाले की, काँग्रेसला गरीब नव्हे तर गरीबी नष्ट करायची आहे. ‘मनरेगा’ हा ‘गरीबी हटाव’चा पहिला टप्पा होता. आता ‘न्याय’हा दुसरा व निर्णायक टप्पा असेल.ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? यासाठी पैसा कुठून आणणार? या प्रश्नांना उत्तर देताना गांधी म्हणाले की, सखोल विचार करून आम्ही ही योजना तयार केली आहे. त्यासाठी जगातील उत्तमोत्तम अर्थतज्ज्ञांचा विचार व सल्ला घेण्यात आला आहे. देशाची सध्याची वित्तीय क्षमता पाहता या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे ही अशक्य कोटीतील बाब नाही, हे त्यांनीही मान्य केले आहे. योजनेचा तपशील करण्याचे काम सुरू आहे. देशात चांगल्या कामांसाठी मुबलक पैसा आहेकोणत्याही देशात कधीही राबविली न गेलेली अशी ही योजना आहे. ती सादर करण्याचा आजचा दिवस काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, असेही राहुल म्हणाले. आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली व सत्तेवर येताच ती लागूही केली. त्याचप्रमाणे गरिबांना ‘न्याय’ देण्याचे हे वचनही काँग्रेस पूर्ण करेल, असे ते म्हणाले.भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी श्रीमंतांचा व गरिबांचा असे दोन भारत तयार करीत आहेत. शेतकऱ्यांना रोज तीन रुपये देण्याची थट्टा करूनही ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. स्वत:च्या खासगी विमानांमधून फिरणाऱ्या उद्योगपतींसाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण काँग्रेस हाच पैसा गरिबांसाठी वापरण्यास कटिबद्ध आहे.योजनेचा हा आहे तपशीलराहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात गरीब २० टक्के कुटुंबांना दरमहा किमान १२ हजार रुपये उत्पन्न असणे हे या योजनेचे मुख्य सूत्र असेल. उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न सहा हजार रुपये असेल तर त्या कुटुंबाला दरमहा सहा हजार रुपये देऊन सरकार किमान १२ हजार रुपयांची पूर्तता करेल. लाभार्थी कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२ हजारांहून जेवढे कमी असेल, त्या फरकाची पूर्तता सरकार करेल. अशा प्रकारे या पाच कोटी कुटुंबाना सरकारकडून वर्षाला कमाल ७२ हजार रुपये दिले जातील. उत्पन्नपूर्तीची ही रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक