शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:50 IST

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ‘मनरेगा’ योजनेद्वारे१४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त केले आहे. आता ही ‘न्याय’ योजना राबवून पाच कोटी गरीब कुटुंबांमधील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून दारिद्र्य निर्मूलनाची लढाई निर्णायकपणे जिंकू, असा दावा त्यांनी केला.काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीनंतर गांधी यांनी पत्रकार परिषदेत योजनेचा तपशील जाहीर केला.राहुल म्हणाले की, कोणालाही काम न करता घरी बसून पैसे देण्याची ही योजना नाही. आताही प् ा्रत्येक जण काम करतच आहे यापुढेही तो करत राहील. पण ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे ते कितीही प्रयत्न केले तरी गरिबीतच खितपत राहतात. सरकार त्यांना एका ठराविक उत्त्पन्नाच्या मर्यादेपर्यंत आणून दारिद्र्याच्या नष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास मदत करेल. भविष्यात जेव्हा किमान १२ हजार रुपये मासिक उत्पन्न नसेलेले एकही कुटुंब देशात शिल्लक राहणार नाही, तेव्हा या योजनेची गरजच राहणार नाही व ती बंद होईल.ही योजना टप्प्याटप्याने राबविली जाईल. आधी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवून सुरुवात केली जाईल व नंतर ती देशभर राबविली जाईल, असेही सांगून ते म्हणाले की, काँग्रेसला गरीब नव्हे तर गरीबी नष्ट करायची आहे. ‘मनरेगा’ हा ‘गरीबी हटाव’चा पहिला टप्पा होता. आता ‘न्याय’हा दुसरा व निर्णायक टप्पा असेल.ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? यासाठी पैसा कुठून आणणार? या प्रश्नांना उत्तर देताना गांधी म्हणाले की, सखोल विचार करून आम्ही ही योजना तयार केली आहे. त्यासाठी जगातील उत्तमोत्तम अर्थतज्ज्ञांचा विचार व सल्ला घेण्यात आला आहे. देशाची सध्याची वित्तीय क्षमता पाहता या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे ही अशक्य कोटीतील बाब नाही, हे त्यांनीही मान्य केले आहे. योजनेचा तपशील करण्याचे काम सुरू आहे. देशात चांगल्या कामांसाठी मुबलक पैसा आहेकोणत्याही देशात कधीही राबविली न गेलेली अशी ही योजना आहे. ती सादर करण्याचा आजचा दिवस काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, असेही राहुल म्हणाले. आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली व सत्तेवर येताच ती लागूही केली. त्याचप्रमाणे गरिबांना ‘न्याय’ देण्याचे हे वचनही काँग्रेस पूर्ण करेल, असे ते म्हणाले.भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी श्रीमंतांचा व गरिबांचा असे दोन भारत तयार करीत आहेत. शेतकऱ्यांना रोज तीन रुपये देण्याची थट्टा करूनही ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. स्वत:च्या खासगी विमानांमधून फिरणाऱ्या उद्योगपतींसाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण काँग्रेस हाच पैसा गरिबांसाठी वापरण्यास कटिबद्ध आहे.योजनेचा हा आहे तपशीलराहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात गरीब २० टक्के कुटुंबांना दरमहा किमान १२ हजार रुपये उत्पन्न असणे हे या योजनेचे मुख्य सूत्र असेल. उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न सहा हजार रुपये असेल तर त्या कुटुंबाला दरमहा सहा हजार रुपये देऊन सरकार किमान १२ हजार रुपयांची पूर्तता करेल. लाभार्थी कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२ हजारांहून जेवढे कमी असेल, त्या फरकाची पूर्तता सरकार करेल. अशा प्रकारे या पाच कोटी कुटुंबाना सरकारकडून वर्षाला कमाल ७२ हजार रुपये दिले जातील. उत्पन्नपूर्तीची ही रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक