शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Congress: राहुल गांधींच्या ‘स्टाफ’मध्ये आहेत तरी कोण? गुलाम नबी आझाद यांनी राजीनाम्यात केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 06:47 IST

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी आपल्या पाच पानी राजीनाम्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय स्टाफवर हल्लाबोल केला होता

- आदेश रावल  नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी आपल्या पाच पानी राजीनाम्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय स्टाफवर हल्लाबोल करीत म्हटले होते की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नव्हे, तर राहुल गांधी यांचा स्टाफ सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेतो. गुलाम नबी आझाद यांच्यापूर्वी चौधरी बीरेंद्र सिंह, हेमंता बिसवा सरमा, आरपीएन सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, जयवीर शेरगिल, राव इंद्रजित, एस. एम. कृष्णा, नारायण राणे, भुवनेश्वर कलिता, प्रेमा खांडू, सुष्मिता देव, सुनील जाखड, कपिल सिब्बल, हार्दिक पटेल आणि संजय सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

राहुल गांधी यांच्या स्टाफमध्ये कोण व्यक्ती काय निर्णय घेतात? पीए अलंकार सवई : महाराष्ट्रातील रहिवासी आहेत आणि पूर्वी बँकेत काम करत होते. काँग्रेसचे अनेक नेते अलंकार यांच्यावर आरोप करीत आलेले आहेत की, ते आपल्या पसंतीच्या नेत्यांनाच राहुल गांधी यांच्या जवळ जाऊ देतात. त्यांची आपल्या पसंतीच्या नेत्यांची एक यादी आहे. अलंकार हे राहुल गांधी यांच्यासोबतच असतात. मग ते दिल्लीत असोत वा बाहेर एखाद्या दौऱ्यावर. कनिष्क सिंह : यांना राहुल गांधी यांचे मित्रही म्हटले जाते. २०१४ पासून राहुल यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे कनिष्क हे आजकाल काँग्रेसमधील मतभेदांकडे लक्ष ठेवून असतात. तसेच, राहुल यांच्याशी संबंधित कायदेशीर प्रकरणेही ते पाहतात. ते माजी राजनैतिक अधिकारी एस. के. सिंह यांचे चिरंजीव आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण तेच पाहतात.कौशल विद्यार्थी : हे विदेशातून शिक्षण घेऊन आलेले आहेत. राहुल गांधी यांची भेट कोणाशी होणार आणि दौरे याचा कार्यक्रम कौशल हेच निश्चित करतात. असे सांगितले जाते की, ते फक्त कामाशी काम ठेवतात. ई-मेल, ट्विटर हँडल्सवरून ते रिप्लाय देतात.बायजू : हे एसपीजीमध्ये अधिकारी होते. २०१० मध्ये त्यांनी नोकरी सोडली. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाची रूपरेखा तयार करणे हे बायजू यांचे काम आहे. काँग्रेस सध्या ज्या भारत जोडो यात्रेची तयारी करत आहे, याची जबाबदारी बायजू यांच्याकडे आहे. ते केरळातील आहेत. राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण