शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

पेगॅसस निकालाचे काँग्रेस, कायदेतज्ज्ञांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 05:31 IST

Pegasus : पेगॅसस पाळत प्रकरण हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधी यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे असा पलटवार भाजपने केला आहे.

नवी दिल्ली : पेगॅसस पाळत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेस तसेच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. पेगॅसस पाळत प्रकरण हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधी यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे असा पलटवार भाजपने केला आहे. पेगॅससबाबत केंद्राने तत्परेतेने आपली योग्य भूमिका न्यायालयात मांडली नाही असा घरचा आहेर एनडीएमधील घटक पक्ष जनता दल (यू)ने भाजपला दिला आहे.

पेगॅससद्वारे करण्यात आलेले फोन टॅपिंग हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती पेगॅसस प्रकरणातील सत्य नक्कीच शोधून काढेल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, काही राज्यांचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजपचे केंद्रीय मंत्री यांचेही फोन पेगॅससद्वारे टॅप करण्यात आले. त्यातून मिळणारी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोहोचविली जात होती का? 

पेगॅससद्वारे केलेल्या फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगत पेगॅससच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींना खोटे बोलण्याची सवय : भाजपकाँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार खोटे बोलतात. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नेमण्याचा आदेश दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले आहेत अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. पात्रा म्हणाले की, लोकांची दिशाभूल करणे, खोटे बोलणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जुनी सवय आहे. भाजपचा लोकशाही यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले.

केंद्राने योग्य भूमिका मांडली नाही : जेडीयूपेगॅसस प्रकरणात केंद्राने तत्परतेने योग्य रितीने भूमिका न्यायालयापुढे मांडली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने पेगॅससबाबत चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला अशी टीका भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) या पक्षाने केली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. त्यागी म्हणाले, न्यायालयाने पेगॅसस प्रकरणी दिलेला आदेश ऐतिहासिक महत्वाचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकालसर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. खासगीपणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा ऐतिहासिक निकाल आहे असे कायदेतज्ज्ञांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दुष्यंत दवे तसेच राकेश द्विवेदी, गीता लुथ्रा आदी ज्येष्ठ वकीलांनी पेगॅसस प्रकरणीच्या निकालाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस